जमिनीला भेगा, हलणारी घरं, 'इथल्या' लोकांना शेवटी उपोषण का करावं लागलं?

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC Marathi
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तळकोकणात सिंधुदुर्गमध्ये काही अनपेक्षित घडलं. इथं दोडामार्ग तालुक्यातल्या काही गावांच्या लोकांनी जवळच असलेल्या तिलारी या धरणाच्या पाण्यापाशी बसून उपोषण सुरू केलं.
खायनाळे, शिरंगे आणि जवळपासच्या गावातल्या लोकांनी 6 मार्चला हे साखळी उपोषण सुरू केलं. हे उपोषण होतं इथलं धरणाजवळचं आणि जंगलपट्ट्यातलं खाणकाम थांबावं म्हणून.
या सततच्या खाणकामामुळे धरणाला, जंगलाला आणि मुख्य म्हणजे इथल्या मानवी वस्तीलाही धोका आहे, असं जेव्हा स्थानिक गावकऱ्यांना जाणवायला लागलं, तेव्हा त्यांना उपोषणाला बसावं लागलं.
त्याचा परिणाम म्हणून सिंधुदुर्गच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हे खाणकाम सध्या थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पण यामुळे पश्चिम घाटातल्या सर्वात सधन निर्सगाच्या पट्ट्याच्या संवर्धनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
हा प्रश्न नवा नाही. विशेषत: सिंधुदुर्ग आणि लगतच्या गोव्यातल्या पश्चिम घाटातल्या मानवी हस्तक्षेपाचा मुद्दा किमान गेली दोन दशकं राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. आता या उदाहरणामुळे पुन्हा एकदा तो प्रश्न चर्चेत आला.

फोटो स्रोत, Laxman Gawde/UGC
या भागात, म्हणजे दोडामार्ग तालुक्यात आणि त्याच्या भोवतालच्या परिसरात आम्ही फिरतो, तेव्हा अनेक ठिकाणी तिलारीच्या बाजूला या खाणकामाच्या खुणा दिसतात. लोकांशी बोलतो तेव्हा त्यांची चिंता, अस्वस्थता जाणवते.
यंत्रांनी पोखरलेला हा डोंगर महाराष्ट्राच्या सर्वाधिक घनदाट जंगलपट्ट्यांमधला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरचं दोडामार्गचं जंगल आहे.
इथेच आहे, या दोनही राज्यांनी एकत्र येऊन दोन दशकांपूर्वी बांधलेलं तिलारी धरण. जरी या प्रकल्पात गोवा राज्याचा हिस्सा अधिक असला तरीही महाराष्ट्रासाठी त्याचं महत्त्व कमी नव्हे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
धरणाची आणि जंगलाची, दोन्हीची पर्वा न करता इथं खाणकाम दिवसाउजेडी आणि अंधारातही सुरु होतं. त्यामुळे स्थानिकांसमवेत गेली अनेक वर्षं इथलं पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे तज्ञही विचारतात की अशा ठिकाणी खाणकामाची परवानगी दिलीच कशी?
'ब्लास्टिंग व्हायचं, जमिनीला भेगा गेल्या, रात्री अपरात्री घरं हालायची'
जेव्हा आम्ही या भागात फिरतो तेव्हा या खाणींचे परिणाम, त्यांच्या जखमा जशा जंगलातल्या डोंगरराजीवर दिसतात, तशा त्या भोवतालच्या रहिवाशी वस्त्यांवरही दिसत राहतात.
खायनाळे, शिरंगे आणि आजूबाजूच्या गावांवर त्या दिसतात. इथं काही जुनी गावं आहेत. जेव्हा तिलारीचं धरण झालं तेव्हा धरणक्षेत्रातून विस्थापित झालेली आणि आता जुन्या गावांच्याच आधारानं पुनर्वसन झालेली गावंही आहेत.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
जंगलाच्या आसऱ्यानं वर्षानुवर्षं राहणारी ही गावं आहेत. इथंच शेती करुन राहणारी ही माणसं आहेत. काही पिढ्या शहरांकडे सरकल्या, पण अजूनही जुन्यांतले आणि तरुणांमधले अनेक जण जंगलाला आणि गावाला धरुन आहेत.


जरी गेली बरीच वर्षं इथं होणारं खाणकाम ते पाहात होते, पहिल्यांदाच त्यांना हे आपल्या इथं राहण्याच्या मुळावर येईल, अशी भीती वाटली.
पश्चिम घाटाचा जैवविविधतेनं भरलेला आणि त्यासाठीच संवेदनशील असलेल्या या भागात सरकारी परवाने घेऊन गेल्या मोठ्या काळापासून खाणकाम सुरू होतं. जमिनी स्थानिकांच्या ज्या वेगवेगळ्या कंत्राटदारांनी या उद्योगासाठी घेतल्या होत्या. इथं दिवसरात्र खोदकाम सुरू होतं.

फोटो स्रोत, Google Earth
आज जरी इथं कामं थांबलेली असली, तरी धरणाच्या पाण्याकाठनं फिरतांना या सगळ्या खाणी दिसतात. शेजारी एकमेकांना अगदी लागून आहेत.
त्यांची मोठमोठाली यंत्रं अजून तिथेच पडून आहेत. ही सगळी मोठमोठी यंत्रं, बुलडोझर, जेसीबी काम करत होते. ब्लास्टिंगसुद्धा सातत्यानं सुरू होतं.
गावकरी ते अनेक वर्षं पाहत होते. पण आता त्यांना जेव्हा दिसलं की ज्या डोंगरांची संरक्षक भिंत, जी खाणकाम आणि त्यांच्यामध्ये उभी आहे, तिलाच फोडणं सुरू झालंय, त्यांना आवाज उठवण्याशिवाय पर्याय उरला नाही.

फोटो स्रोत, BBC Marathi
"इतकं की दररोज 30-35 डंपर दहा फेऱ्या गावातून जातांना आम्ही पाहायचो. कोणत्याही वेळेस ब्लास्टिंग व्हायचं. त्यावेळेस अमोनियाचा वापर होतो. तो अमोनिया या धरणाच्या पाण्यात, बाकीच्या जलस्त्रोतांमध्ये जाणार. त्याचा इथल्याच नाही तर गोव्याच्या पिण्याच्या पाण्यावरही परिणाम होणार नाही का");