भारतानं खरंच जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात चौथा क्रमांक पटकावलाय?
भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी 24 मे 2025 रोजी केला.
पण दोनच दिवसांनी सोमवारी (26 मे रोजी नीती आयोगाचे सदस्य अरविंद विरमाणी म्हणाले की 2025च्या अखेरीस भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मग खरं कुणाचं? काही अर्थतज्ज्ञांना असं वाटतं की भारताने जीडीपीबद्दल दावे करण्यात घाई केली आहे. सुब्रमण्यम नेमकं काय म्हणाले होते?
भारताचा GDP वाढला म्हणजे गरिबी दूर झाली का? भारतातलं दरडोई उत्पन्न किती आहे पाहिलंय का?
- वार्तांकन - संदीप राय, जॅस्मीन निहलानी
- निवेदन - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - राहुल रणसुभे