राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली- बाळा नांदगावकर

फोटो स्रोत, Getty Images
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. याबाबत पत्र पोलीस आयुक्तांना आणि केंद्र सरकारला दिल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राकारणाला वेग आला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी गोंडाचे खासदार बृजभूषण यांनी केली आहे.
काल काय झालं होतं?
मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू झाली.
यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे संतापले असून, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून इशारा देणारं पत्र लिहिलंय.
"राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांवरील कारवायांचा निषेध नोंदवलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पत्रात काय म्हटलंय?
राज ठाकरेंनी पत्रात मनसैनिकांवरील कारवीचा निषेध करत म्हटलंय की, "सर्व देशबांदवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. 4 मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!"
या पत्रातून राज ठाकरेंनी आरोप ही केलाय, ते म्हणालेत की, "गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का");