भारत-पाकिस्तान संघर्ष : आधी शस्त्रसंधीवर सहमती, मग उल्लंघनाचे आरोप; नेमकं काय घडलं?

सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केलं. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव आणि गेल्या चार दिवसांत झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांनी या शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवल्याचं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"अमेरिकेने रात्री उशीरापर्यंत केलेल्या मध्यस्थीच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आणि विवेकाबद्दल त्यांचे धन्यवाद.' असं Truth Social वर त्यांनी पोस्ट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

भारतानं रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

दरम्यान, शस्त्रसंधीला काही तास उलटायच्या आधीच त्याच्या उल्लंघनाबाबत बातम्या समोर येत आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

वाचा मिस्री यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही तासांपूर्वी शस्त्रसंधी झाली होती, पण त्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत आहे.
  • त्यामुळे भारतीय सैन्यदलाकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि याला पाकिस्तान जबाबदार आहे.
  • पाकिस्तानने सद्यपरिस्थिती समजून घ्यावी आणि अशी घुसखोरी ताबडतोब थांबवावी.
  • सैन्याला अशा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आहे. तसंच, पाकिस्तानने असं उल्लंघन टाळावं आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं.
  • भारतीय सैन्यदल याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाविरोधात चोख प्रत्युत्तर देण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.
व्हीडिओ कॅप्शन, 'पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं घोर उल्लंघन', परराष्ट्र सचिवांचं विधान

याआधी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक पोस्ट केली आहे.

"शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत," असं त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यानंतर रात्री अकराच्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही तासांमध्ये पाकिस्तानच्या दिशेने शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं दिसत आहे.

पाकिस्ताननं हे अतिक्रमण थांबवावं आणि ते थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत. सध्या आम्ही या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

तसेच कोणत्याही अतिक्रमणाला रोखण्यासाठी ठोस आणि कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती विक्रम मिस्री यांनी दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान मध्यरात्रीच्या भाषणात काय म्हणाले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मध्यरात्री देशाला उद्देशून भाषण केलं. "कोणी स्वातंत्र्याला आव्हान दिलं तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी काहीही करू," असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

पाकिस्तानवर विनाकारण आरोप केले जात असून, त्याची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तावर ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात मशिदींचं नुकसान झालं असून निरपराध लोक मारले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करानं याचा कसा सामना केला याबाबतही माहिती दिली. "आपल्या मूल्यांचं रक्षण करण्यात देश यशस्वी झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानी यशस्वी झाले आहे, आपण जिंकलो आहोत. हा विजय आहे," असं ते म्हणाले.

हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत शरीफ यांनी कौतुक केलं. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलं. देशातील विरोधी पक्षांचेही शरीफ यांनी आभार मानले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि चीनसह मध्यस्थी करणाऱ्या देशांचे आभार मानले.
फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि चीनसह मध्यस्थी करणाऱ्या देशांचे आभार मानले.

सर्वांच्या हितासाठी शस्त्रसंधी केली आणि त्यासाठी सकारात्मक असल्याचंही शरीफ म्हणाले. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे आभार मानतो. अमेरिकेने यात महत्त्वाची भूमिका बजावली," असंही ते म्हणाले.

मध्यस्थी करणाऱ्या सौदी अरेबिया, तुर्कीये आणि कतारसह इतर राष्ट्रांचेही च्यांनी आभार मानले. ब्रिटनच्या सल्ल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.

तसंच प्रिय आणि विश्वासार्ह मित्र असा उल्लेख करत चीनचं कौतुक केलं. पाकिस्तानला गरज असताना चीन पाठिशी उभा राहिला असं ते म्हणाले.

पाणी वाटपासह, काश्मीर आणि इतर सर्व वादग्रस्त मुद्दे सुटण्याची आशा व्यक्त करत त्यांनी भाषण संपवलं.

@OmarAbdullah

फोटो स्रोत, @OmarAbdullah

बीबीसी प्रतिनिधी माजीद यांनी म्हटलं की, आम्ही आरएस पुरा येथील रहिवाशांशी बोललो. त्यांनी जवळपास अर्धातासापासून फायरिंग सुरू असल्याचं सांगितलं.

तर स्वर्ण लाल यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, अंदाजे 5 वाजेच्या सुमारास 15 मिनिटे फायरिंग झाली. त्यानंतर शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर तासभर फायरिंग थांबली. पण आता पुन्हा पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे.

शस्त्रसंधीवर सहमतीनंतर भारतानं काय म्हटलं होतं?

शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर झाल्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेतली.

यावेळेस परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, 'पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सशी संपर्क केला. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी हालचाली थांबवल्या जातील. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे अंमलात येईल. त्यानंतर 12 मे रोजी पुन्हा एकदा या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल असे निश्चित करण्यात आले आहे.'

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ट्विट

फोटो स्रोत, X/realDonaldTrump

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशक डार यांनीही ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. 'भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला तात्काळ तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानने नेहमीच प्रदेशात (भारतीय उपखंडात) शांतता आणि सुरक्षा राहावी तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत.' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी गोळीबार व लष्करी हालचाली थांबवण्यास सहमती दिल्याचं ट्वीटरवर जाहीर केलं आहे. भारतानं कोणत्याही प्रकारच्या दहशवातबाबत तडजोड न करण्याची भूमिका कायम ठेवल्याचं आणि यापुढेही तीच भूमिका कायम ठेवली जाईल असं जयशंकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

@DrSJaishankar

फोटो स्रोत, @DrSJaishankar

अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी ट्वीट केले आहे, "गेल्या 24 तासांत उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि मी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर तसंच सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल आणि असीम मलिक यांच्याशीही बोललो.

मला हे जाहीर करताना आनंद वाटतो की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांना तात्काळ शस्त्रसंधी मान्य केली आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्रयस्थ जागी बातचीत करण्याची तयारी दाखवली आहे.

पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी शांततेचा मार्ग निवडण्यासाठी दाखवलेलं समजूतदारपणा, विवेक आणि मुत्सद्दीपणा यासाठी आम्ही त्यांची प्रशंसा करतो."

@SecRubio

फोटो स्रोत, @SecRubio

शस्त्रसंधीनंतर कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?

  • पाकिस्तानने दावा केला की त्यांच्या GF-17 च्या माध्यमातून S-400 आणि ब्राम्होस क्षेपणास्त्रांचं नुकसान केलं. ते साफ खोटं आहे.
  • त्यांच्या दाव्यानुसार भारतातली एअरफिल्ड्स जसं की सिरसा, जम्मू, पठाणकोट, भठिंडा, नलिया आणि भूज इथे आहेत. ही माहिती पण चुकीची आहे.
  • पाकिस्तान म्हणालं की भारताचा चंदिगड आणि बियास येथील तोफखाना नष्ट झाला. हे पण खोटं आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी सुरक्षित आहेत.
  • पाकिस्तानकडून आणखी एक खोटा आरोप केला जातोय की भारतीय सेनेनं मशिदींचं नुकसान केलं. पण मी स्पष्टपणे सांगते की भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय सैन्य हे संवैधानिक मूल्यांना जपतं.
  • भारतीय सेनेनं पाकिस्तानी लष्कराचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. यामध्ये जमिनीवरील आणि हवेतील सामुग्रींचा समावेश आहे.
  • याशिवाय भारताने पाकिस्तानच्या एअरफिल्डचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पाकिस्तानची संरक्षण प्रणाली, रडार सिस्टिम यांना नुकसान पोहोचवलं.
  • लाइन ऑफ कंट्रोलजवळील कमांड अँड कंट्रोल, मिलिटरीच्या पायाभूत सुविधा आणि पाकिस्तानी सैन्याचं एवढं नुकसान केलं की त्यांची लढण्याची क्षमता नष्ट झाली.

भारताच्या अखंड सुरक्षेसाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे, असंही कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

शस्त्रसंधीच्या निर्णयाआधी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष संपवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांवर त्यांनी चर्चा केली.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भारत आणि पाकिस्तानशी चर्चा ?

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंही सौदीचे परराष्ट्र मंत्री आणि इशाक दार यांच्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं की , "इशाक दार यांनी त्यांना काल रात्रीच्या भारतीय हल्ल्यांनंतर आणि पाकिस्तानच्या प्रत्युत्तर कारवाईनंतर प्रदेशातील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली."

त्याचवेळी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

भारत सरकारकडून पत्रकार परिषद घेत सध्याच्या घडामोडींवर माहिती दिली गेली.

"पाकिस्तानच्या मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाया प्रक्षोभक आहेत, तरीही या कारवायांना भारतानं अत्यंत जबाबदारीनं प्रत्युत्तर दिलं," असं भारत सरकारनं सांगितलं.

पत्रकार परिषदेत माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "पाकिस्तानच्या सैन्यानं संपूर्ण पश्चिम सीमेवर सातत्याने आक्रमक हल्ले केले. पाकिस्ताननं युकॅब ड्रोन, लाँग रेंज वेपन, लॉयटरिंग म्युनिशन आणि लढाऊ विमानांचा उपयोग करत भारतीय सैन्य तळांना लक्ष्य केलं.

"नियंत्रण रेषेवरही ड्रोनची घुसखोरी आणि मोठ्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर, श्रीनगरपासून नलियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलानं बहुतांश हल्ल्यांना यशस्वीपणे निष्क्रिय केलं."

भारतानं पत्रकार परिषेदत दिली ही माहिती :

  • "उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूच, भटिंडा या भारतीय हवाई दलाच्या स्टेशन्सवर उपकरण आणि सैनिकांना पाकिस्ताननं नुकसान पोहचवलं. पाकिस्ताननं सकाळी 1 वाजून 40 मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर केला. तसेच पंजाबच्या एअरबेस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला."
  • "पाकिस्ताननं श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूरच्या वायूसेनेच्या तळांवरील शाळा आणि हॉस्पिटल परिसरांनाही लक्ष्य केलं. हे अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार कृत्य केलं. यातून त्यांची नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती उघड झाली आहे."
  • "पाकिस्ताननं सैन्य ठिकाणांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं. यानंतर भारतीय सुरक्षा दलानं त्वरित आणि सुनियोजित प्रत्युत्तर दिलं. यात टेक्निकल इस्टॉलेशन, कमांड आणि कंट्रोल सेंटर, रडार साईट आणि शस्त्रास्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं."
  • "रफिकी, मुरीद, चकलाला, रहिमीयार खान, सुकूर आणि चुनिया येथील पाकिस्तानच्या सैन्य तळांवर एअर लाँचसारख्या अचूक लक्ष्य भेदणाऱ्या हत्यारं आणि लढाऊ जेटनं हल्ला करण्यात आला. पसूर येथील रडार साईट आणि सियालकोट येथील एविएशन बेसलाही अचूकपणे लक्ष्य करण्यात आले."
  • "या कारवाईत भारतानं कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली. पाकिस्ताननं सैन्य कारवाया कळू नये यासाठी लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांच्या आड लपून आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा दुरुपयोग केला. हे चिंताजनक आहे."
कर्नल सोफिया कुरेशी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कर्नल सोफिया कुरेशी
  • "पाकिस्तानच्या या खेळीमुळं भारतीय हवाई दलाला नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करत अत्यंत संयम ठेवत कारवाई करण्यास भाग पाडलं."
  • "याशिवाय पाकिस्ताननं खोट्या माहितीचाही आसरा घेतला. पाकिस्ताननं सोशल मीडियावर अशी खोटी माहिती पसरवली की, आदमपूर येथील एस 400 प्रणाली, सुरतगड आणि सिसरच्या हवाई तळांवर, नगरोटाच्या ब्रम्होस बेस, देहरागिरीच्या तोफखाना ठिकाणांवर आणि चंदिगडच्या दारुगोळा ठिकाणं नष्ट केली. भारत पाकिस्तानच्या या खोट्या प्रचार मोहिमेला फेटाळतो."
  • "नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याचा वापर करत घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले. कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजुरी आणि अखनुर सेक्टरमध्ये तोफ, मोटार आणि हलक्या वेपननं भीषण हल्ले होत राहिले. याला भारतीय सैन्यानं प्रभावी आणि तुलनात्मक प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सैन्याला मोठं नुकसान पोहचवलं आहे."
  • पाकिस्तानच्या मुख्य ठिकाणांवर सैनिकांची तैनाती वाढताना दिसत आहे. यावरून पाकिस्तानला ही परिस्थिती अधिक चिघळवायची इच्छा आहे हे दिसतं. भारतीय सुरक्षा दल पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आतापर्यंत शत्रुत्वाच्या भावनेनं केलेल्या सर्व हल्ल्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
  • भारतीय सुरक्षा दल याचा पुनरुच्चार करत आहे की, आम्हाला तणाव वाढवायचा नाही. मात्र, पाकिस्ताननंही तसाच व्यवहार करावा.

कर्नल सोफिया यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या शस्त्रास्त्रांनी एलओसीवर पाकिस्तानच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केल्याची माहिती देत पत्रकार परिषदेत त्याचे व्हिडीओही दाखवले.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानचे कोणते मुद्दे फेटाळले?

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (10 मे) पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून 'भारताच्या पायाभूत सुविधांवर हल्ले' झाल्याचे दावे 'खोटे' असल्याचं म्हटलं.

विक्रम मिस्री म्हणाले, "भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज प्रणाली, सायबर प्रणाली इत्यादींवर मोठ्या प्रमाणात हल्ला होऊन ते नष्ट झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे आहेत."

"मी सर्वांना आवाहन करतो की, पाकिस्तान सरकारकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीनं कृपया दिशाभूल होऊ देऊ नका," असंही आवाहन मिस्री यांनी केलं.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

विक्रम मिस्री पुढे म्हणाले, "पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून असा हास्यास्पद दावा केला जात आहे की भारताने श्री अमृतसर साहिबवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र भारताचे विभाजन करण्यासाठीचे हे कमकुवत प्रयत्न अयशस्वी होणारच."

भारतानं अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.

या आरोपांचे खंडन करताना विक्रम मिस्री म्हणाले, "भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केले आहे हा आणखी एक हास्यास्पद दावा आहे."

"हा पूर्णपणे निराधार आरोप आहे आणि मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, अफगाणिस्तानातील लोकांना हे आठवण करून देण्याची गरज नाही की गेल्या दीड वर्षात कोणत्या देशाने अफगाणिस्तानातील नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना अनेक वेळा लक्ष्य केलं आहे," असंही मिस्री यांनी नमूद केलं.

'पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्याचा मृत्यू'

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं, "राजौरीहून दुःखद बातमी. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. ते शुक्रवारी (9 मे) उपमुख्यमंत्र्यांसोबत राजौरीत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते."

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

राजौरी शहरात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

ते म्हणाले, "आज (10 मे) पाकिस्तानने राजौरी शहरावर गोळीबार केला. यादरम्यान, अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं. त्या हल्ल्यात राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला"

'पहिल्यांदाच जम्मूच्या मध्यभागी असलेल्या भरवस्तीत हल्ला'

जम्मू शहरातील रेहादी कॉलनी या परिसरात सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर घरांचे नुकसान झाले. या हल्ल्यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, असं स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं.

शहराच्या मध्यभागी असलेल्या नागरी वस्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही स्थानिकांनी नमूद केलं.

स्थानिक रहिवासी राकेश गुप्ता यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि परिसरात धुराचे लोट पसरले. राकेश गुप्ता म्हणाले, "तिथे भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. पाकिस्तान सामान्य लोकांना का लक्ष्य करत आहे");