भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची लढाऊ विमाने पाडण्यात आली? CDS जनरल अनिल चौहान यांनी अखेर दिलं उत्तर

भारत-पाकिस्तान संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पहायला मिळाला. या लष्करी संघर्षादरम्यान भारताच्या लढाऊ विमानांना नुकसान पोहोचवण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता. आता याच दाव्यांबाबत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी उत्तर दिलं आहे.

सीडीएस जनरल चौहान यांनी आज शनिवारी (31 मे) ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केलं आहे.

"किती विमानांचं नुकसान झालं हे जाणून घेण्यापेक्षा ते नुकसान का झालं, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे," या मुद्द्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र, त्यांनी पाकिस्तानकडून सहा विमानांना नुकसान पोहोचवण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.

सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं की, "जेट पाडण्यात आले, हे जास्त महत्त्वाचं नसून ते का पाडण्यात आले, हे महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं."

मात्र, सीडीएस चौहान यांनी विमानांच्या संख्येबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

सीडीएस अनिल चौहान हे सध्या 'शांगरी-ला डायलॉग'मध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. तिथेच त्यांनी 'ब्लूमबर्ग'ला ही मुलाखत दिली आहे.

याआधी याच महिन्याच्या सुरुवातीला तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल ए. के. भारती यांनी म्हटलं होतं की, "आपण युद्धात आहोत आणि नुकसान होणं, हा त्याचाच एक भाग आहे."

पाकिस्तानने वारंवार हा दावा केला आहे की, त्यांनी या संघर्षादरम्यान भारताची एकापेक्षा अधिक लढाऊ विमाने पाडलेली आहेत. मात्र, भारताने हे दावे नेहमीच फेटाळून लावलेले आहेत.

जनरल अनिल चौहान यांनी आणखी काय म्हटलं?

या महिन्यात पाकिस्तानबरोबर चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षामध्ये भारताचं एखादं लढाऊ विमान पाडण्यात आलं होतं का, असा प्रश्न सीडीएस अनिल चौहान यांना याच मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.

'ब्लूमबर्ग टीव्ही'ने याच मुलाखतीतील एक मिनीट पाच सेकंदांचा एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

'पाकिस्तानचा असा दावा आहे की, त्यांनी एकापेक्षा अधिक भारतीय विमाने पाडलेली आहेत. तुम्ही याबाबत पुष्टी करु शकता का,' असा सवाल 'ब्लूमबर्ग टीव्ही'च्या पत्रकाराने जनरल अनिल चौहान यांना केल्याचं या व्हीडिओमध्ये दिसून येतंय.

या प्रश्नाचं उत्तर देताना जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं की, "जेट पाडण्यात आलं, हे महत्त्वाचं नाही, तर ते का पाडलं हे महत्त्वाचं आहे."

लष्करी जवानांना भेटताना सीडीएस जनरल अनिल चौहान

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लष्करी जवानांना भेटताना सीडीएस जनरल अनिल चौहान

या उत्तरावर पत्रकाराने त्यांना पुन्हा एकदा विचारलं की, "किमान एक जेट पाडण्यात आलं. हे खरंच असं घडलंय का");