भाजपला महाराष्ट्रात 2019 सारखं यश मिळवणं कठीण झालंय का? - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गोंधळ, गदारोळ, गडबड... महाष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (एनसीपी) मध्ये फूट पडल्यानंतर अनेक लोकांकडून हेच शब्द ऐकू आले.
दोन पक्षांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणूका होत आहेत.
भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे आणखी चार पक्ष आहेत. तसंच, उमेदवार उभं करत नसला, तरी राज ठाकरेंचा मनसे पक्षही प्रचाराच्या निमित्ताने मैदानात आहेच.
महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात झालेल्या राजकीय गोंधळाकडे पाहून सर्वसामान्य मतदार वैतागलेल्या मनस्थितीत दिसून येतो.
पुण्यातील नांदेड सिटी भागात राहणाऱ्या शोभा कारळे म्हणतात, "जिथं पैसा असतो, नेते तिथंच जातात. सर्वसामान्य माणूस इतका त्रस्त झाला आहे की, त्यांची मतदानासाठी जाण्याची इच्छाच नाही."
पुण्यातच राहणाऱ्या दुसऱ्या एका मतदारानं सांगितलं, "भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुम्ही पक्षात का घेत आहात? भ्रष्टाचारी नेते तिकडं गेले आणि सर्व मंत्री झाले. हे सर्व कसं घडतं, लोकांना सर्वकाही कळतं आहे."
मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कच्या बाहेर आपल्या मित्रांबरोबर बसलेले निवृत्ती एसपी वेलणकर यांच्या मते, "लोक पक्ष फोडणाच्या विरोधात आहे."
त्यांच्याजवळ उभे असलेले दर्शन पाटील म्हणाले, "भाजपा पक्ष फोडतो आहे, याचा अर्थ तुमच्या पक्षात काहीतरी कमतरता आहे. त्यामुळंच ते पक्ष फोडत आहेत."
लोकशाही धोक्यात आहे, या विरोधी पक्षांच्या आरोपावर दर्शन पाटील विचारतात, "कोणाची लोकशाही धोक्यात आहे? लोकशाहीत हिंदू धोक्यात आहेत? सर्वसामान्य माणसाची लोकशाही धोक्यात आहे");