ऑपरेशन ट्रायडेंट : पारशी डॉक्टरची बोट, रॉच्या गुप्तहेरांचं सोंग आणि कराची बंदराची वाताहत

फोटो स्रोत, INDIAN NAVY
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात होण्याच्या जवळपास दोन महिने आधी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली होती.
त्या बैठकीला तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम, नौदलप्रमुख ॲडमिरल एस एम नंदा आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे 'रॉ' या भारतीय गुप्तहेर संस्थेचे प्रमुख रामनाथ काव उपस्थित होते.
भारतीय नौदलाला गुप्त माहिती मिळाली होती की, पाकिस्तानातील कराची बंदरात एक अत्याधुनिक नेव्हल सर्व्हेलन्स सिस्टीम लावण्यात आली आहे.
ॲडमिरल नंदा यांनी काव यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या लोकांकडून याबाबत आणखी माहिती मिळवून देऊ शकता का?
काव यांना वाटत होतं की, पाकिस्तानच्या सर्व्हेलन्स क्षमतांची पडताळणी करण्यासाठी त्यांना तिथल्या फोटोंची आवश्यकता असेल. या प्रकारची गुप्त माहिती सर्वसाधारण गुप्तहेर गोळा करू शकत नव्हते. त्यासाठी विशेष तज्ज्ञ गुप्तहेरांची आवश्यकता होती.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
गुप्त मिशनसाठी एका डॉक्टरच्या बोटीची निवड
काव यांचे डेप्युटी संकरन नायर यांनी मुंबईतील 'रॉ'च्या टॉपच्या गुप्तहेराला संपर्क करून या कामाची जबाबदारी त्याला दिली.
पाच दिवसांनंतर 'रॉ'च्या गुप्तहेरानं नायर यांना संपर्क करून त्याचा प्लॅन सांगितला. तसंच हेदेखील सांगितलं की तो एका अशा व्यक्तीला ओळखतो, ज्याची या कामात मदत होऊ शकते. या योजनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी नायर स्वत: मुंबईत आले.

नायर यांनी 'इनसाइड आयबी अँड रॉ, द रोलिंग स्टोन दॅट गॅदर्ड मॉस' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "मला माझ्या मुंबईतील गुप्तहेरानं सांगितलं की तिथे राहणारे पारशी डॉक्टर कावसजी या कामात माझी मदत करू शकतात. कामाच्या निमित्तानं ते त्यांच्या बोटीनं कुवेतमार्गे पाकिस्तानला जात असतात."
यातील रंजक गोष्ट अशी की, हे कोणालाही माहित नव्हतं की कावसजी यांच्या बोटीला पाकिस्तानी त्यांच्या बंदरात का आणि कसं येऊ देत होते.

फोटो स्रोत, MANAS PUBLICATION
त्यांच्या म्हणण्यानुसार, "कावसजी यांचं कुटुंब 1880 च्या दशकापासून जहाज बांधणीच्या व्यवसायात होतं. ते कराची बंदरातून व्यवसाय करायचे. त्यांचं कुटुंबदेखील कराचीमध्ये राहत होतं. देशाची फाळणी झाल्यानंतरदेखील या सधन पारशी कुटुंबातील लोक कराचीमध्येदेखील होते आणि मुंबईतदेखील होते, हे बहुधा त्यामागचं कारण होतं."
"दोन महिन्यांआधी कावसजी यांच्या बोटीवर मुंबईतील कस्टम अधिकाऱ्यांनी कागदपत्रात न दाखवलेला माल पकडला होता, तेव्हा ते संकटात सापडले होते. त्यांच्या विरोधात कस्टम विभागाची चौकशी सुरू होती. त्यामुळे डॉक्टरांना यासंदर्भात एक मोठा दंड भरावा लागण्याची शक्यता होती. मला माहित होतं की मला काय करायचं."
संकरन आणि कावसजी यांची भेट
मुंबईतील कस्टम विभागाचा प्रमुख संकरन नायर यांचा मित्र होता. संकरन यांनी त्याला फोन केला. सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यानंतर नायर यांनी त्याला त्यांची अडचण सांगितली.
10 मिनिटांनी असं ठरलं की रॉ त्यांच्या गुप्त फंडातून डॉक्टरांना लावण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम भरेल आणि कस्टम विभाग एक पत्र जारी करेल की डॉक्टरांच्या विरोधातील प्रकरण संपलं आहे.
हे पत्र घेऊन नायर त्यांच्या दोन विश्वासू गुप्तहेरांबरोबर डॉक्टर कावसजी यांच्या डीएन रोडस्थित क्लिनिकमध्ये गेले.
त्यांनी कावसजी यांना स्वत:ची ओळख भारतीय नौदलाचे कमांडर मेनन अशी करून दिली.

फोटो स्रोत, RK YADAV
त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, "मी तुम्हाला कस्टम विभागाचं हे पत्र देऊ शकतो, ज्यात लिहिलं आहे की तुमच्याविरोधातील प्रकरण मागे घेण्यात आलं आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला माझ एक छोटंसं काम करावं लागेल."
कमांडर मेनन बनून आलेल्या संकरन नायर यांनी डॉक्टरांना सांगितलं, "तुम्ही यासाठी नकार देखील देऊ शकता. अशा परिस्थितीत हे पत्र मी जाळून टाकेन आणि तुमच्या विरोधात चौकशी सुरू होईल."
डॉक्टर कावसजी यांना अंदाज आला होता की, नायर यांचा प्रस्ताव मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही.
'रॉ'च्या दोन गुप्तहेरांबरोबर कावसजी कराचीला रवाना
अनुषा नंदाकुमार आणि संदीप साकेत यांनी 'द वॉर दॅट मेड आर अँड ए डब्ल्यू' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "डॉक्टर कावसजी यांनी नायर यांना विचारलं की तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? नायर म्हणाले की तुम्ही पाकिस्तानच्या पुढील प्रवासात तुमच्या बोटीवर माझी दोन माणसं घेऊन जा. हा प्रवास दोन दिवसांनी सुरू होईल. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की किमान मला त्या दोघांची नावं तरी सांगा."
"त्यावर नायर यांनी म्हटलं की, त्यांची नावं 'रॉड' आणि 'मॉरियार्टी' अशी आहेत. त्यांचं खरं नाव राव आणि मूर्ति होतं. राव हे नायर यांचे नेव्हल असिस्टंट होते, तर मूर्ति रॉच्या फोटोग्राफी विभागातील तज्ज्ञ होते."

फोटो स्रोत, Getty Images
दोन दिवसांनंतर योजनेनुसार, कावसजी त्यांचे दोन नवे साथीदार 'रॉड' आणि 'मॉरियार्टी' यांच्याबरोबर एका बोटीनं कराचीसाठी रवाना झाले. पाकिस्तानच्या सागरी सीमेत शिरेपर्यंत कोणतीही विशेष घटना घडली नाही.
अनुषा आणि संदीप त्यांच्या पुस्तकात लिहितात, "तोपर्यंत पाकिस्तानला हे माहित झालं होतं की भारतानं एक नवीन गुप्तहेर संस्था स्थापन केली आहे. ज्यात धाडसी आणि कठीण मिशन पूर्ण करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांना अद्याप या नव्या गुप्तहेर संस्थेचं नाव माहित झालं नव्हतं."
आजारी लोकांच्या केबिनमध्ये दोन गुप्तहेर
कावसजी यांची बोट कराची बंदरात येताच, पाकिस्तानी सीआयडी इन्स्पेक्टर त्याच्या दोन सहकाऱ्यांसह त्यांच्या बोटीवर आला. त्यांना पाहताच डॉक्टर घाबरले.
मग पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बोटीची तपासणी केली. जेव्हा त्यांना कागदपत्रांमध्ये नोंद असलेले दोनजण त्यांच्या बर्थवर मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी त्या दोघांबद्दल चौकशी केली.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
अनुषा नंदाकुमार आणि संदीप साकेत लिहितात, "ते दोघे बोटीतच लपलेले होते. मात्र या इन्स्पेक्टरच्या नजरेत येण्याची त्यांची इच्छा नव्हती. इन्स्पेक्टरनं विचारलं की 'ते दोघे कुठे आहेत"तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम " loading="lazy" width="800" height="536" style="aspect-ratio:800 / 536" class="bbc-139onq"/>
फोटो स्रोत, Getty Images
अनुषा नंदाकुमार आणि संदीप साकेत यांनी लिहिलं आहे, "वॉर रूममध्ये जगजीवन राम, रामनाथ काव आणि ॲडमिरल नंदा यांनी त्या फोटोंचा अभ्यास केला. मूर्ती यांनी त्यांना कराची बंदराचं 360 अंशातून म्हणजे चारी बाजूंनी काढलेलं पूर्ण दृश्य दाखवलं होतं. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीनं त्या फोटोंकडे आश्चर्यानं आणि कौतुकानं पाहिलं."
"कराची बंदराच्या आतील फोटो भारताच्या हाती लागण्याची ही पहिलीच वेळ होती. आता भारतीय नौदलाला हे माहित झालं होतं की ,पाकिस्ताननं कोण कोणत्या ठिकाणी संरक्षणात्मक व्यवस्था उभी केली आहे आणि त्याची क्षमता किती आहे."
त्यांना हे देखील माहित झालं की कोणत्या ठिकाणी इंधन साठवण्यात आलं आहे आणि पाकिस्तानी नौदलाच्या कोणकोणत्या युद्धनौका कराची बंदरात उभ्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
3 डिसेंबर 1971 ला भारत-पाक युद्धाची अधिकृत घोषणा झाली. मात्र त्याआधी भारताच्या हाती कराची बंदराचा पूर्ण नकाशा, पूर्ण चित्र आलं होतं. पाकिस्ताननं त्यांच्या सर्वात चांगल्या डॉल्फिन क्लासच्या पाणबुड्यांना तैनात केलं होतं. त्यांच्या 8,000 नौसैनिकांपैकी फक्त 5,000 नौसैनिकांना युद्धात तैनात करण्यात आलं होतं.
ॲडमिरल नंदा त्यांच्या 'द मॅन हू बॉम्ब्ड कराची' या पुस्तकात लिहितात, "युद्ध सुरू होईपर्यंत पाकिस्तानी नौदलाच्या सैनिकांची संख्या आणि आणखी कमी झाली होती. कारण बंगाली सैनिक एकतर नौदल सोडून पळून गेले होते किंवा पाकिस्तान्यांचा त्यांच्यावरील विश्वास संपला होता."
"पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांची वागण्याची पद्धत अशी होती की, 29 नोव्हेंबरपर्यंत देखील त्यांनी पाकिस्तानी नौदल प्रमुखांना देखील हे सांगितलं नव्हतं की चार दिवसात युद्ध सुरू होणार आहे."
ॲडमिरल नंदा यांनी घेतली इंदिरा गांधींची परवानगी
3 डिसेंबर 1971 ला भारत-पाक युद्धाची सुरुवात झाल्यानंतर भारतीय नौदलानं कराचीवर हल्ला करण्याची योजना अंमलात आणण्यास सुरुवात केली.
त्याआधी ऑक्टोबर महिन्यात ॲडमिरल नंदा इंदिरा गांधींना भेटण्यास गेले होते.
त्यांनी नौदलाच्या तयारीबद्दल इंदिरा गांधी यांना सांगितल्यानंतर, विचारलं होतं की जर नौदलानं कराची बंदरावर हल्ला केला तर त्यामुळे सरकारला राजकीयदृष्ट्या काही अडचण असू शकते का?

फोटो स्रोत, IRAL NANDA FAMILY
नंदा त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "इंदिरा गांधींनी हो किंवा नाही म्हणण्याऐवजी मलाच प्रश्न विचारला की 'तुम्ही असं का विचारत आहात");