window.__reverb = {}; window.__reverb.__reverbLoadedPromise = new Promise((resolve, reject) => { window.__reverb.__resolveReverbLoaded = resolve; window.__reverb.__rejectReverbLoaded = reject; }); window.__reverb.__reverbTimeout = setTimeout(() => { window.__reverb.__rejectReverbLoaded(); }, 5000);

लोकसभा निकाल : राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड

लोकसभा निवडणूक निकालासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स त्याचप्रमाणे देशातील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.

थोडक्यात

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध सहकारी पक्षांनी नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली.
  • भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं.
  • भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला लोकसभेत बहुमत मिळाल्याबद्दल चीननं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात दाखल होतील असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
  • इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत का असं विचारल्यावर राष्ट्रीय लोकदलाचे नेते तेजस्वी यादव यांनी, थोडं थांबा, काय काय होतं ते पाहात राहा असं उत्तर दिलं आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासह पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आहे.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?

    उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?

    फोटो स्रोत, Getty Images

    उत्तर आणि मध्य भारत आणि पश्चिमेकडील काही भागांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून उष्णता प्रचंड वाढली आहे. तसंच कमाल तापमान 45-46C च्या आसपास आहे आणि काही भागात ते 50 अंशापर्यंत पोहोचलं आहे.

    मात्र, मान्सून सुरू झाल्यानं येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

    या उन्हाळ्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त होतं. दिल्लीसारख्या शहरात तर पारा पन्नाशीला टेकला होता.

    उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?

    उष्माघात कसा ओळखावा?

    उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणंसुद्धा दिसतात.

    लहान मुलांनी काही आहार घेण्यास नकार दिला, किंवा चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना उष्माघात झाला असू शकतो.

    उष्णतेची लाट येते, तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण वाढतं.

    उष्माघाताची लक्षणे

    • चक्कर येणे, उल्ट्या होणं, मळमळ होणे.
    • शरीराचे तापमान जास्त वाढणे.
    • पोटात कळ येणे.
    • शरीरातील पाणी कमी होणे.

    उष्माघात झाल्यास काय कराल?

    • तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
    • दरम्यानच्या काळात, संबंधित व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
    • ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
    • त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
    • एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
    • त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
    • त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
  2. आयर्लंडचं भारतासमोर अवघ्या 98 रन्सचं लक्ष्य

    आयर्लंडचं भारतासमोर अवघ्या 98 रन्सचं लक्ष्य

    फोटो स्रोत, Getty Images

    पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी अवघ्या 98 रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ग्रुप ‘ए’च्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

    भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडच्या फदाजांना डोकं वर काढायची संधीही दिली नाही. हार्दिक पंड्यानं तीन विकेट्स काढल्या तर अर्शदीप आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

  3. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना एकत्र ठेवणं हे नरेंद्र मोदींसमोरचं मोठं आव्हान का आहे?

    नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना एकत्र ठेवणं हे नरेंद्र मोदींसमोरचं मोठं आव्हान का आहे?

    फोटो स्रोत, ANI

    नरेंद्र मोदी आता किती काळ पंतप्रधान राहणार आणि कोणत्या पद्धतीने काम करणार हे सगळं आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून असेल.

    मागच्या दोन्ही वेळेस भाजप केंद्रात बहुमतात होतं. यावेळी मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. अशा स्थितीत मोदींना त्यांचे अनेक अजेंडे बाजूला ठेवावे लागतील.

    भाजपने 240 जागा जिंकल्या असून बहुमतासाठी 272 जागांची गरज आहे. मात्र, एनडीएला 293 जागा मिळाल्या असून सरकार स्थापनेसाठी एवढ्या जागा पुरेशा आहेत.

    चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने मिळून 28 जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्याच वेळी, इंडिया आघाडीला बहुमतासाठी 40 जागा कमी आहेत.

    आज ( 5 जून) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध सहकारी पक्षांनी नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली. दिल्लीत झालेल्या बैठकीत 21 सदस्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यावेळी झालेल्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमारही उपस्थित होते.

  4. सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्टारलायनर अवकाशात झेपावलं, अशी असेल मोहीम

  5. छाया कदम मुलाखत : 'कानमधला 8 मिनिटांचा टाळ्यांचा कडकडाट विसरू शकत नाही'

    व्हीडिओ कॅप्शन, छाया कदम मुलाखत : 'कानमधला 8 मिनिटांचा टाळ्यांचा कडकडाट विसरू शकत नाही'
  6. बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान अवकाशात झेपावलं

    भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं.

    सुनीता यांच्यासोबत अंतराळवीर बॅरी विलमोरही या यानात आहेत. याबरोबरच 'बोईंग' ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारी दुसरी खासगी कंपनी ठरली आहे. तर इलॉन मस्क यांची 'स्पेस एक्स' ही अशी कामगिरी बजावणार पहिली खासगी कंपनी होती.

    बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, स्टारलायनरच्या कॅप्टन असतील सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत अंतराळवीर बॅरी विल्मोर असतील.

    याआधी दोन वेळा या यानाचं उड्डाण ऐनवेळी रद्द करावं लागलं होतं. पण अखेर 5 जून रोजी अमेरिकेत फ्लोरिडाच्या केप कॅनावराल येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्टारलायनरनं उड्डाण केलं. अमेरिकन अंतराळसंस्था नासानं अंतराळस्थानकात माणसं तसंच सामानाची ने-आण करता यावी, यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे

    अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचं काम आता जुन्या अंतराळयानांच्या ऐवजी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्या करतील असं जाहीर करत नासाने या दोन्ही कंपन्यांसोबत समान काँट्रक्ट केले होते. यानुसार या कंपन्यांच्या कॅप्सूल्स वापरण्यात येतील आणि सहा मिशन्ससाठीचा हा करार आहे.

    स्पेस एक्स (Space X) सोबतचा करार 2.6 अब्ज डॉलर्सचा होता तर बोईंगसोबतच 4.2 अब्ज डॉलर्सचा. स्पेस एक्स कंपनीने मानवी क्रू सह 2020 मध्ये चाचणी केली. याचा अर्थ बोईंग 4 वर्षं मागे आहे. कंपनीने गोष्टी सुधारण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे.

    बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान अवकाशात झेपावलं

    फोटो स्रोत, Getty Images

    स्टारलायनर कसं आहे?

    मागच्या बाजूला सर्व्हिस मॉड्यूल लावल्यानंतर स्टारलायनर अंतराळयान 5 मीटर उंच आणि 4.6 मीटर रुंद (16.5*15 फूट) आहे. अपोलो मोहीमांसाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूल्सपेक्षा स्टारलायनर रुंद आहे. यामध्ये 7 अंतराळवीरांना बसता येईल इतकी जागा आहे, पण नियमितपणे साधारण 4 अंतराळवीर यातून झेपावतील. 10 वेळा या कॅप्सूलचा वापर केला जाऊ शकतो.

    इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या दिशेने प्रवास करताना क्रू या यानामधील आसनव्यवस्था, यानातली इतर जीवनावश्यक प्रणाली आणि नेव्हिगेशन - मार्गदर्शक यंत्रणा, ISS मध्ये सामान नेणारी यंत्रणा यांची पाहणी करेल.

    शिवाय हे अंतराळवीर नवीन स्पेससूट वापरून त्यांचीही चाचणी घेतील. बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे बोईंगचे नवीन निळ्या रंगाचे स्पेससूट घालतील. अमेरिकेच्या याधीच्या अंतराळवीरांनी वापरलेल्या स्पेससूट्सपेक्षा नवीन स्पेससूट्सचं वजन 40% कमी आहे आणि ते अधिक फ्लेक्झिबल - ताणता येण्याजोगे आहेत. या सूटचे ग्लोव्हज टचस्क्रीन वापरण्यासाठी योग्य आहेत. त्यामुळे अंतराळयानातील टॅब्लेट्स अंतराळवीरांना वापरता येतील.

    स्टारलायनर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 10 दिवस Docked म्हणजे जोडलेलं असेल आणि त्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. अमेरिकेची यापूर्वीची अंतराळवीरांना परत घेऊन येणारी कॅप्सूल्स समुद्रात कोसळत होती. पण स्टारलायनर मात्र नैऋत्य अमेरिकेत कुठेतरी जमिनीवर लँडिंग करेल.

    या यानाला असलेलं Heatshield - उष्णता कवच आणि पॅराशूट त्याचा जमिनीकडे झेपावण्याचा वेग कमी करतील आणि जमिनीवर यानाची कॅप्सूल आदळू नये म्हणून एअरबॅग्सही उघडतील.

  7. या मतदारसंघांमध्ये मराठा-ओबीसी-वंजारी यांनी एकामेकांविरोधात नाही तर एकाच बाजूला दिली मतं

    या मतदारसंघांमध्ये मराठा-ओबीसी-वंजारी यांनी एकामेकांविरोधात नाही तर एकाच बाजूला दिली मतं

    फोटो स्रोत, Getty Images

    लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल आलेले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी बहुमताचा आकडा पार केला असला तरी इंडिया आघाडीने भरपूर जागा जिंकल्या आहेत.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे आणि काँग्रेसने कमबॅक केलं आहे.

    उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांनी सहापैकी चार जागा गमावल्या आहेत आणि डॉ. भारती पवार, सुभाष देसाई अशा मातब्बर नेत्यांचा पराभव झालेला दिसून येतोय.

    फक्त जळगाव जिल्ह्यातल्या दोन जागा टिकवण्यात भाजपला यश आलेलं आहे.

    विश्लेषक सांगतात की भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांच्या विरोधात निगेटिव्ह रिपोर्ट गेला होता.

    नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरीतून भारती पवार आणि धुळ्यातून सुभाष भामरे या तिन्ही उमेदवारांच्या विरोधात जनमत आहे, आणि तिथे नवे चेहरे द्यायला हवेत असं पक्षाला दिसलं होतं.

    तरीही तेच उमेदवार 'रिपीट' केल्याचा फटका महायुतीला (NDA ) ला बसला.

    याखेरीज उत्तर महाराष्ट्रात कोणते फॅक्टर चालले आणि कोणते नाही, ते सविस्तर पाहूया.

  8. देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीसाठी कार्यकर्त्यांच्या घोषणांचा 'सागर'

    देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीनंतर कार्यकर्त्यांच्या घोषणांचा 'सागर'

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान 'सागर' याठिकाणी भाजपच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच काम करावं अशी भावना असल्याचं भाजपच्या नेत्यांनी फडणवीस यांना सांगितलं. तर काही कार्यकर्त्यांनी सागर बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली.

  9. पराभवानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिला राजीनामा

    ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सलग 24 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे.

    लोकसभा निवडणुकांबरोबरच ओडिशातही विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात त्यांच्या बिजू जनता दलाचा मोठा पराभव झाला.

    @NAVEEN_ODISHA

    फोटो स्रोत, @NAVEEN_ODISHA

    राज्याच्या 147 सदस्यांच्या विधानसभेत 78 जागा भाजपाला, 51 बिजू जनता दलाला आणि 14 काँग्रेसला जागा मिळाल्या. याशिवाय माकपाचा 1 आणि 3 अपक्षांचा विजय झाला.

    नवीन पटनाईक यांनी ट्वीट केलं, मला सतत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी ओडिशाच्या साडेचार कोटी जनतेचा मी आभारी आहे. मी माननीय राज्यपाल रघुबर दास यांची भेट घेतली आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला. मी ओडिशाच्या लोकांच्या सेवेसाठी पुढेही कटिबद्ध राहेन.”

  10. अरविंद केजरीवालांची अंतरिम जामीनाची याचिका फेटाळली

    अरविंद केजरीवालांची अंतरिम जामीनाची याचिका फेटाळली

    फोटो स्रोत, ANI

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. आरोग्याच्या कारणाखाली त्यांनी अंतरिम जामीन मिळावा अशी विनंती केली होती. ती याचिका दिल्लीतल्या न्यायालयाने फेटाळली आहे.

    केजरीवाल यांना प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता. 1 जून रोजी मतदान प्रक्रिया संपल्यावर ते 2 जूनला पुन्हा कारागृहात हजर झाले होते.

    त्यानंतर त्यांना 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं.

  11. fffff
  12. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड

    फोटो स्रोत, Getty Images

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध सहकारी पक्षांनी नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली. दिल्लीत झालेल्या बैठकीत 21 सदस्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेते म्हणून निवड

    फोटो स्रोत, UGC

    या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासह जे. पी. नड्डा, नितीशकुमार, राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, एच. डी. कुमारस्वामी, चिराग पासवान, जीतनराम मांझी, पवन कल्याण, सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रफुल्ल पटेल, प्रमोद बोरो, अतुल बोरा, इंद्रहांग सुब्बा, सुदेश महातो, राजीव रंजन सिंग, संजय झा उपस्थित होते.

  13. चीननं केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन

    @MFA_CHINA

    फोटो स्रोत, @MFA_CHINA

    भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला लोकसभेत बहुमत मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.

    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता माओ निंग म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल अभिनंदन, आम्ही चीन आणि भाजपामध्ये चांगल्या आणि स्थिर संबंधांची आशा करतो.”

    लोकसभा निवडणूक 2024 चे सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.देशात एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 234 जागांवर यश मिळालं.

  14. अल्पवयीन आरोपीचा निरीक्षणगृहातील मुक्काम एक आठवड्याने वाढला

    पोर्शे अपघात प्रकरणातील मुलाच्या पालकांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

    फोटो स्रोत, UGC

    19 मे 2024 च्या पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अतिवेगानं जाणाऱ्या पोर्शे कारनं दुचाकीवरच्या दोघांना उडवलं. त्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला.

    या अपघातात अनिश अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत त्या दोघांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

    अल्पवयीन मुलाला 12 जून पर्यंत बाल निरीक्षण गृहात ठेवण्यास न्यायालयाची परवानगी दिली आहे.

    त्यानंतर या प्रकरणी मुलाचे आई वडील आणि तो ज्या पबमध्ये दारु प्यायला होता, त्या ठिकाणच्या मॅनेजर, तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.

    पोर्शे अपघात प्रकरणात अटक झालेल्या पालकांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी तर डॅाक्टरांना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  15. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून येण्याची 5 कारणं

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून येण्याची 5 कारणं

    फोटो स्रोत, UGC

    महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यात आलेले निकालही पुरेसे बोलके आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठी लाभार्थी ठरलीय ती काँग्रेस. पण सर्वांच्या नजरा या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे होत्या.

    शरद पवारांसाठीसुद्धा ही निवडणूक तशी चांगली ठरलीय कारण त्यांची खासदार संख्या वाढलीये. उद्धव ठाकरे यांच्या साठीसुद्धा या निवडणूक निकालांकडे सकारात्मक म्हणून पाहिलं जातंय.

    त्याचं मुख्य कारण आहे पक्षात फूट पडल्यानंतर 18 पैकी 12 खासदार त्यांना सोडून गेले होते. त्यांच्याकडे फक्त 6 खासदार उरले होते. पक्ष खिळखिळा झाला होता. नेत्यांची वानवा होती.

    मग अशाही स्थितीत उद्धव ठाकरे यांना 9 खासदार कसे निवडून आणता आले याची चर्चा करण क्रमप्राप्त ठरतं. त्याची मुख्य 5 कारणं आहेत.

  16. नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात

    नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात

    फोटो स्रोत, Getty Images

    नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात दाखल होतील असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.

    4 जून रोजी मान्सून गोव्यात दाखल झाला होता. गेल्या दोन दिवसांत गोव्यासह कोकण, तसंच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. पुढच्या चार दिवसांतही इथल्या जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    कोकण आणि गोव्यात 8 आणि 9 जून 2024 रोजी जोरदार पावासाचा इशारा दिला आहे. इथे 64.5 ते 115.5 मिलीमीटरहून अधिक, म्हणजे 204.4 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे.

    त्यासाठी सिंधूदुर्ग आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रातलं हवामान असं असेल.

    नैऋत्य मोसमी वारे येत्या तीन चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात

    फोटो स्रोत, IMD

    कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात तापमानाचा पारा थोडा खाली येतो आहे.

    भंडारा, मालेगाव येथे 41.2 °C कमाल तापमान हे राज्यातलं सर्वाधिक तापमान होतं तर पुणे येथे 21.2°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते

  17. नरेंद्र मोदींचे निवडणुकीतील चार मुद्दे, ज्यामुळे या निवडणुकीत नाही झाली आधीसारखी कामगिरी

    नरेंद्र मोदींचे निवडणुकीतील चार मुद्दे, ज्यामुळे या निवडणुकीत नाही झाली आधीसारखी कामगिरी

    फोटो स्रोत, ANI

    भारताचे पहिले पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे नेते जवाहरलाल नेहरू यांनी 52 वर्षांपूर्वी म्हणजे 1962 साली सलग तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला होता.

    2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल बघता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात. पण गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यावेळी त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.

    या निवडणुकांमध्ये 400 हून अधिक जागा मिळवण्याचा एनडीएचा दावा फोल ठरला.

    एक्झिट पोलचे बहुतेक अंदाज चुकीचे ठरले. कारण भाजप किंवा एनडीए आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

    या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेससह, इतर अनेक राजकीय पक्षांनी 'इंडिया' आघाडी बनवून सत्ताधारी भाजपला आव्हान दिलं आणि एक्झिट पोलच्या आकडेवारीला खोटं ठरवत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.

    विश्लेषकांच्या मते, "पंतप्रधान स्वतःच निवडणुकांचे केंद्रबिंदू बनले होते."

    म्हणजेच 'वोट फॉर मोदी' किंवा वोट 'अगेन्स्ट मोदी' हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनला होता. आताचे निकाल बघता 'वोट फॉर मोदी'ची घोषणा तितकी जादू दाखवू शकली नाही, जेवढी अपेक्षा भाजपने केली होती.

    ज्या प्रमुख मुद्द्यांमुळे युती बहुमताचा आकडा पार करू शकली, पण भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आलं नाही, ते प्रमुख मुद्दे कोणते होते त्यावर एक नजर टाकूया.हा लेख सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  18. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे- एकनाथ शिंदे

    आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

    फोटो स्रोत, Getty Images

    आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

    एकनाथ शिंदे म्हणाले, "निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला, रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले.पराभवाची कारणमिमांसा केली जाईल."

    ते पुढे म्हणाले, "गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले.या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे.देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन.अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही.जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे.आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले."

  19. नितीश कुमार आणि चंद्राबाबू पुन्हा चर्चेत, का आहे त्यांच्याकडे सगळ्यांची नजर?

    लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपनं केलेल्या दाव्याप्रमाणं त्यांना स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. एनडीए आघाडीला मात्र बहुमताचा आकडा गाठता येईल असं दिसत आहे.

    पण या निकालांमध्ये दोन पक्षांच्या कामगिरीनं सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडं वळल्या आहेत. हे दोन पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांना तेलुगू देसम पार्टी आणि नितिश कुमारांचा जनता दल युनायटेड.

    नितीश कुमार आणि चंद्राबाबू पुन्हा चर्चेत, का आहे त्यांच्याकडे सगळ्यांची नजर?

    फोटो स्रोत, ANI

    चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) लोकसभा निवडणुकीत 16 जागांवर आघाडी असल्याचं सायंकाळपर्यंत समोर आलेल्या आकड्यांवरून पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी जवळपास एकहाती सत्ता मिळवल्याचं स्पष्ट होत आहे.

    तर दुसरा पक्ष म्हणजे नितीश कुमारांच्या जेडीयूला 12 जागा मिळणार असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा गौरव केला.

    निवडणूक पूर्व आघाडीचा विचार करता हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वातील एनडी आघाडीबरोबर होते. पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचं दिसू लागल्यानं या दोन्ही पक्षांकडे सर्वांची नजर वळली आहे.हा लेखसविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  20. 'राहुल गांधींनी पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेते पद घेऊ नये,' असं कुमार केतकर यांना का वाटतं?