'आम्हाला वाटलं तो बॉलच आहे' – मुलांचे जीव घेणारे आणि त्यांना अपंग बनवणारे बाँब

ही घटना घडली तेव्हा पुचू नऊ वर्षांचा होता

फोटो स्रोत, Ronny Sen for the BBC

फोटो कॅप्शन, पुचूने बॉल म्हणून उचलेल्या वस्तूचा मोठा स्फोट झाला. ही घटना घडली तेव्हा तो नऊ वर्षांचा होता.
  • Author, सौतिक बिस्वास आणि नुपूर सोनार
  • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Twitter,

गेल्या तीन दशकात पश्चिम बंगालमध्ये गावठी बाँबने किमान 565 मुलांचं आयुष्य उद्धवस्त केलं असल्याची माहिती बीबीसीच्या संशोधनातून समोर आली आहे. यात काहींचे बळी गेलेत, काही जण कायमचे विकलांग झालेत, तर काहींची दृष्टी गेली आहे.

ही कुठली संहारक गोष्ट आहे आणि पश्चिम बंगालच्या राजकारणाशी या हिंसाचाराचा कसा संबंध आहे? या राजकीय हिंसाचाराची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंगाली मुलांना का चुकवावी लागत आहे?

मे 1996 ची लखलखीत सोनेरी सकाळ. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या एका झोपडपट्टीतली सहा पोरं सकाळीच क्रिकेट खेळायला बाहेर पडली.

जोधपूर पार्क या भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या छोट्या घरांच्या दाटीवाटीच्या वस्तीत राहणारी ही मुलं जवळच्याच अरुंद गल्लीत क्रिकेट खेळत होती. तो सुट्टीचा दिवस होता. कारण त्या दिवशी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होतं.

या मुलांमध्ये एक होता पुचू सरकार. नऊ वर्षांचा हा मुलगा वडील झोपलेले पाहून हळूच क्रिकेटची बॅट हाती घेऊन हळूच घराबाहेर पडला होता. त्याच्या घराजवळच्या गल्लीतून लगेचच बॅटवर आदळणाऱ्या बॉलचा आणि नंतरच्या मुलांच्या आरडा-ओरडीचा आवाज यायला लागला होता.

एकाने बॉल असा टोलवला की तो त्यांच्या कथित सीमारेषा ओलांडून गल्लीतल्या त्या बनवलेल्या पीचपेक्षा खूप दूर छोट्या बागेत जाऊन पडला. बॉलच्या मागे मुलं धावली. बॉलच्या शोधात असताना त्यांना तिथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सहा गोळे ठेवलेले दिसले.

अगदी क्रिकेटच्या बॉलएवढ्याच आकाराचे ते गोळे चेंडूच वाटत होते. त्यांना वाटलं कुणी तरी दुसरं इथे खेळायला आलेलं असणार आणि तेच हे बॉल ठेवून गेले असतील. पोरांनी ते 'बॉल' उचलले आणि पुन्हा खेळायला गल्लीत पोहोचले.

त्या पिशवीतल्या 'बॉल'पैकीच एक मग खेळायला घेतला गेला. पहिलाच बॉल टोलवण्यासाठी पुचू बॅट घेऊन सज्ज होता. बॉल त्याच्या बॅटला लागला, मात्र, कानाचे पडदे फाटतील असा आवाज झाला. त्या स्फोटाने सगळी गल्ली हादरली. पुचूच्या बॅटने टोलवलेली ती वस्तू बाँब होती.

स्फोटानंतर हळूहळू धूर थोडा कमी झाला, तसे काय झालं बघायला शेजारी-पाजारी धावले. पुचू आणि त्याचे पाच मित्र रस्त्यावर इतस्ततः विखुरून पडलेले त्यांना दिसले. त्वचा काळी झालेली, कपडे फाटलेले आणि कपडे आणि शरीरं फाटलेली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्षणात काय झालं त्याचा अंदाज आला आणि आक्रोश, किंकाळ्यांनी आसमंत पुन्हा हादरला.

सात वर्षांचा अनाथ राजू दास जागीच मृत्यूमुखी पडला. त्याची आत्या त्याला सांभाळायची. आणखी एक सात वर्षांचाच गोपास बिस्वास गंभीर जखमी होता. त्यानेही प्राण सोडला. चार इतर मुलं जखमी झाली.

पुचू अगदी थोडक्यात बचावला. पण तो बराच भाजला होता. अणकुचीदार खिळे त्याच्या छातीत, पोटात घुसले होते आणि चेहराही रक्तबंबाळ झाला होता. जीव तेवढा वाचला.

पुढचा जवळपास महिनाभर पुचू रुग्णालयात होता. त्याला घरी सोडलं, त्यानंतरही शरीरात राहिलेल्या सुया, खिळे अक्षरशः स्वयंपाक घरातल्या चिमट्याने ओढून काढावे लागले. कारण हॉस्पिटलचा खर्च कुटुंबाला परवडेना तेव्हा उपचार पूर्ण होण्याअगोदरच पुचूला घरी सोडलं होतं आणि पुढची सगळी काळजी त्याच्या घरीच घ्यावी लागणार होती.

पुचू आणि त्याचे मित्र हे पश्चिम बंगालच्या गावठी बाँबस्फोटाचे बळी होते. अशा जीवघेण्या बाँबस्फोट बळींची यादी मोठी आहे. राज्यात राजकीय वर्चस्वासाठी रक्तरंजित हिंसाचार या राज्यात गेली अनेक दशकं सुरू आहे आणि ही अशी निरागस मुलं या हिंसेच्या संस्कृतीचे बळी ठरत आहेत.

गावठी बाँबस्फोटात आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये किती बालमृत्यू झाले याची कुठलीही अधिकृत नोंद किंवा आकडेवारी उपलब्ध नाही.

म्हणून बीबीसीने त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही आनंदबझार पत्रिका आणि बर्तमान पत्रिका या दोन नामांकित बंगाली वृत्तपत्रांच्या 1996 ते 2024 दरम्यानच्या सर्व आवृत्त्या तपासून अशा बाँबस्फोटात जखमी झालेल्या किंवा दगावलेल्या मुलांसंदर्भातली प्रत्येक बातमी वाचली.

10 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, क्रूड बाँबस्फोटांनी 565 मुलांचं आयुष्य उद्धवस्त केल्याचं आमच्या संशोधनात दिसलं. यात 94 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 471 मुलं जखमी झाली आहेत. याचा अर्थ गावठी बाँबने साधारणतः दर 18 दिवसांनी एकाचा बळी घेतला आहे.

गावठी बाँबस्फोटात मुलं जखमी झाल्याच्या आणखीही काही घटना बीबीसीने शोधल्या, ज्याचं रिपोर्टिंग या दोन वृत्तपत्रांत झालेलं नव्हतं. याचा अर्थ बाँबस्फोटातील बळींची संख्या याहून अधिक असणाची दाट शक्यता आहे.

या घटनांमधील 60 टक्के घटनांमध्ये घराबाहेर – मैदानात, रस्त्यावर, बागेत, शेतात किंवा अगदी शाळेजवळ खेळणाऱ्या मुलांना हादरे बसलेले आहेत. विशेषतः निवडणूक काळात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हे बाँब तयार करून घेतले आणि वापरण्यापूर्वी ते या ठिकाणी लपवले गेले होते.

या घटनांमध्ये बळी पडलेली बहुतेक मुलं गरीब घरांमधली होती. कुणी घरकाम करणाऱ्यांची, मजुरीची किंवा तशीच कामं करणाऱ्या श्रमिकांची ही मुलं होती.

पश्चिम बंगालमधील बॉम्बचा क्रांतिकारी इतिहास

पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार देशातलं चौथं मोठं राज्य आहे. दहा कोटी लोकसंख्येचं हे राज्य राजकीय हिंसाचारासाठी ओळखलं जातं.

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राज्यात वेगवेगळ्या विचारधारा आणि वेगवेगळ्या पक्षांनी राज्य केलं. त्यातील दोन दशकं काँग्रेसने राज्य केलं. तीन दशकं कम्युनिस्ट विचारांच्या डाव्या आघाडीने पश्चिम बंगालवर सत्ता गाजवली. आणि सध्याचं तृणमूल काँग्रेस सरकारचं 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व आहे.

1960च्या दशकात या राज्यात माओवादी बंडखोर – ज्यांना नक्षलवादी म्हणूनही ओळखलं जातं- त्यांच्यात आणि सरकारी संरक्षण दलांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या.

सगळ्या सरकारी आणि आणि बंडखोर चकमकींमध्ये त्या वेळेपासूनच एक समान धागा होता आणि तो म्हणजे राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात वर्चस्वासाठी आणि विरोधकांना शमवण्यासाठी केलेला क्रूड बाँबचा वापर. दहशत पसरवण्यासाठी विशेषतः निवडणूक काळात या गावठी बाँबचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायचा.

"एकमेकांचे हिशोब चुकते करण्यासाठी बाँबचा वापर होतो. बंगालमध्ये बरेच आधीपासून म्हणजे 100 वर्षांपूर्वीपासून हेच घडत आहे", पश्चिम बंगालचे माजी पोलीस महानिरीक्षक पंकज दत्ता यांनी बीबीसीशी बोलताना नोंदवलं.

पश्चिम बंगालमधील क्रूड बॉम्ब

फोटो स्रोत, Ronny Sen for the BBC

फोटो कॅप्शन, पश्चिम बंगालमधील आजचे क्रूड बॉम्ब ज्यूटच्या दोऱ्यांनी बांधलेले असून त्यात श्रापनेल म्हणजे धातूचे लहान धारदार तुकडे किंवा खिळे, स्क्रू, काच भरलेले असतात.

इसवीसन 1900 च्या सुरुवातीला ब्रिटिशांच्या विरोधात बंडखोरांनी बाँब वापरल्याचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमधील बाँब तयार करण्याची पाळंमुळं तिथे आहेत.

सुरुवातीला बाँब तयार करण्याची पद्धत अगदीच अशास्त्रीय होती आणि असे गावठी बाँब तयार होत असतानाच अपघात होत असत. अशा बाँबच्या चाचणी दरम्यानच एका बंडखोराने हात गमावला होता आणि दुसरा मृत्युमुखी पडला होता.

त्यानंतर एक नेता फ्रान्समधून बाँब तयार करण्याचं तंत्र शिकून आला.

त्याने एका बुक बाँब बनवला होता. एका जाडजूड कायदेविषयक ग्रंथ स्फोटकांनी भरून ठेवला. कॅडबरी कोको टिनमध्ये ती स्फोटकं दडवून ठेवली होती. ते पुस्तक उघडलं असतं तर त्याचं लक्ष्य असलेला ब्रिटीश मॅजिस्ट्रेट कुठल्या कुठे उडून पडला असता.

1907 मध्ये क्रांतिकारकांनी रेल्वे ट्रॅकवर बाँब पेरून स्फोट घडवला. बंगालच्या मदनापूर जिल्ह्यात ही पहिली क्रूड बाँबस्फोटाची घटना नोंदवली गेली. या ट्रॅकवरून धावणाऱ्या रेल्वेतून वरिष्ठ ब्रिटीश अधिकारी प्रवास करत होता. स्फोटात ट्रॅक उडवल्याने रेल्वे रुळांवरून घसरली.

त्यानंतर काही महिन्यांनी बाँबस्फोट करून मुझफ्फरपूरमध्ये एका मॅजिस्ट्रेटला ठार करण्याचा प्रयत्न झाला. तो बेत फसला. पण एका बग्गीत पेरलेल्या या बाँबने दोन ब्रिटीश महिलांचा जीव घेतला.

या घटनेचं तत्कालीन वृत्तपत्रांनी वर्णन केलं आहे त्यात 'tremendous explosion that startled the town," असा मथळा दिला होता. हीच ती घटना, ज्यामुळे खुदीराम बोस हा क्रांतिकारक पुढे शहीद झाला. भारतीय क्रांतिकारकांपैकी हौतात्म्य पत्करणारा तो पहिला स्वातंत्र्य सेनानी ठरला.

राष्ट्रीय नेते बाळ गंगाधर टिळक यांनी 1908 मध्ये या घटनेविषयी लिहिताना म्हटलं होतं – हे बाँब म्हणजे केवळ शस्त्रास्त्रं नव्हेत, हा नवा जादूई संदेश आहे विद्रोहाचा. एक प्रकारे स्वातंत्र्यलढ्याचं गारूड घालणारा संदेश जो बंगालमधून संपूर्ण देशभर पसरणार.

आज बंगालमध्ये हा गावठी बाँब 'पेतो' नावाने ओळखला जातो. हा बाँब सुतळी किंवा तागाच्या धाग्याने बांधला जातो आणि याच्या आत तीक्ष्ण, अणकुचीदार खिळे, नट किंवा स्क्रू आणि काचांसारख्या गोष्टी भरल्या जातात.

या गावठी बाँबमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही बाँबमध्ये स्टीलच्या किंवा काचेच्या बाटलीत स्फोटकं भरलेली असतात. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाबरोबरीच्या चकमकींमध्ये हे बाँब वापरले जातात.

राजकीय कार्यकर्ते, विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्ते प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी, मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठी किंवा आक्रमक होणाऱ्या विरोधक पक्षाला थोपवण्यासाठी असे बाँब फेकतात.

निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र बळकावणे, त्या भागावर नियंत्रण प्रस्थापित करणे या कारणासाठी गावठी बाँबचा वापर कार्यकर्ते करतात.

पॉलमी ही फुलं वेचत असताना तिच्या नजरेस ती वस्तू पडली, तिला ती वस्तू बॉल वाटली.

फोटो स्रोत, Ronny Sen for the BBC

फोटो कॅप्शन, पॉलमी ही फुलं वेचत असताना तिच्या नजरेस ती वस्तू पडली, तिला ती वस्तू बॉल वाटली.

पॉलमी हलदारसारख्या मुलांना अशा हिंसाचारात भाजल्यामुळे भयंकर यातना सोसाव्या लागतात.

एप्रिल 2018 ची सकाळ. त्या वेळी सात वर्षांची असणारी पॉलमी फुलं वेचण्यासाठी घराबाहेर पडते. तळी, हिरवीगार भातशेती आणि नारळाच्या झाडांनी बहरलेल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात गोपालपूर हे तिचं गाव. देवपूजेसाठी फुलं गोळा करण्याच्या उद्देशाने ती लवकरच बाहेर पडली. ग्रामपंचायत निवडणूक अगदी महिन्यावर आलेली होती.

पॉलमीला शेजाऱ्यांच्या पाण्याच्या पंपाजवळ एक चेंडू पडलेला दिसला.

"मी तो उचलला आणि घरी आणला", पौलमी त्या दिवसाबद्दल सांगते.

पॉलमीने घरात पाय ठेवताच तिथे चहा पीत बसलेले तिचे आजोबा तिच्या हातातली गोष्ट बघून हादरतात.

"ते म्हणाले, हे काय आणलंस हातात? चेंडू नाही, बाँब आहे तो बाँब. फेक तो लांब." पण आजोबा काय म्हणत आहेत ते समजेपर्यंत माझ्या हातातच तो बाँब फुटला.

ते शांत गाव स्फोटाने हादरलं. पॉलमीच्या डोळ्याला, चेहऱ्याला आणि हाताला चांगलाच धक्का बसला होता. गर्दी जमू लागली तशी ती बेशुद्ध झाली.

"मला आठवतंय, लोक धावत माझ्याकडे येताना मला दिसले. पण तेवढंच. मला पुढचं सगळं धूसर झालं. मला सगळीकडेच खूप लागलं होतं."

गावकऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं.

तिला झालेल्या जखमा खूप भयंकर होत्या. डावा हात तर तुटला. तिला पुढचा महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घ्यावे लागले.

रोजच्या दिनक्रमातली एक साधीशी सकाळ पॉलमीसाठी काळरात्र ठरली. पॉलमीचं आयुष्य त्या एका घटनेनं संपूर्ण हादरलं, आमूलाग्र बदललं.

सबिना खातून

फोटो स्रोत, Ronny Sen for the BBC

फोटो कॅप्शन, सबिना खातून यांना दुखापतींमुळे दैनंदिन कामं करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो

हे सगळं भोगणारी पॉलमी एकटी नाही.

सबिना खातून तेव्हा 10 वर्षांची होती, जेव्हा मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका गावात गावठी बाँब तिच्या हातात फुटला. एप्रिल 2020 मधली ही घटना. जितापूर नावाच्या भात आणि तागाच्या शेतीसाठी प्रसिद्ध गावातला हा प्रसंग आहे.

सबिना रोजच्या प्रमाणे तिच्या बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. तिला गवतात बाँब सापडला. तिला ते काय आहे हे न कळल्याने ती त्याबरोबर खेळू लागली.

काही क्षणात त्या बाँबचा तिच्या हातातच स्फोट झाला.

"मी स्फोटाचा आवाज ऐकला मात्र आण छातीत धडधडलं. आता या वेळी कोण अपंग होणार? सबिना तर नसेल");