संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम; चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हटलं?

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर बीडच्या न्यायालयात या प्रकरणी आज (26 मार्च) सुनावणीला सुरुवात होत आहे.
( सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले.
12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले असून त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत.
या चार्जशीटच्या आधारे बीबीसी मराठीने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की सदर घटना नेमकी कशी घडली आणि तिचा घटनाक्रम कसा आहे?
29 नोव्हेंबर 2024 - स्थळ मस्साजोग, ता. केज, जि. बीड
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यापासून 11 किमी दूर असलेल्या मस्साजोग गावातील एका कार्यालयातली शांत सकाळ होती. अपारंपरिक ऊर्जा तयार करणाऱ्या अवादा कंपनीचं हे स्थानिक कार्यालय.
दिल्लीच्या परिसरातील नोएडा या औद्योगिक वसाहतीत या कंपनीचं ऑफिस आहे. देशभरात पवनचक्की, सोलार पॅनेल यांच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते.


महाराष्ट्रात यवतमाळ, धामणगाव, बुलढाणा, खामगाव, सातारा, चाळीसगाव या ठिकाणी प्रकल्प उभारल्यानंतर कंपनीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावी एक प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले होते.
मस्साजोगच्या कार्यालयाचे प्रमुख सुनिल केदु शिंदे यांच्या खांद्यावर कंपनीने ही जबाबदारी सोपवली होती. 29 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी अंदाजे 11.30 वाजता शिंदेंना मोबाईलवर एक फोन आला.
या फोननंतर महाराष्ट्र राज्य पूर्ण ढवळून निघेल आणि भविष्यात होणाऱ्या घटनांची या फोनने सुरुवात नोंदवली जाईल याची कल्पना त्यांना असणे शक्यच नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
हा फोन होता विष्णू चाटेचा. सुनिल शिंदे यांनी फोन उचलल्यानंतर विष्णू चाटे म्हणाला, 'वाल्मिक अण्णा बोलणार आहेत.'
'वाल्मिक अण्णा'ने फोनवर सांगितले, "अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा."
त्यावर सुनिल शिंदे यांनी म्हटले होते की, 'बरं आण्णा मी मेसेज देतो'. त्यावर वाल्मिक कराडने शिवी देत म्हटले की मेसेज द्या नाहीतर आणखी काही द्या. पण आहे त्या परिस्थितीत काम बंद करा. "आता निवडणुका झाल्या आहेत मी मोकळाच आहे," असं देखील कराड यावेळी म्हणाला.

फोटो स्रोत, Facebook
काही दिवसांपूर्वीच सुनिल शिंदे यांचे सहकारी आणि अवादा कंपनीचे भूमी अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांच्या परळी येथील कार्यालयातून बोलवणे आले होते.
थोपटे यांनी दिलेल्या जबाबानुसार, '8 ऑक्टोबरला विष्णू चाटेनी धमकी दिली होती की, अवादा कंपनीची केज तालुक्यात असलेली कामं सुरू ठेवायची असतील, तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा काम बंद करा. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईलहून अनेक धमक्या आल्या. जर काम सुरू ठेवलं, तर जिवे मारण्यात येईल अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.'
प्रकल्प अधिकाऱ्याचे झाले होते अपहरण
पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच 28 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुनिल शिंदे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आली होती.
थोपटे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, "8 ऑक्टोबर 2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटे यांची भेट झाली होती. या भेटीत देखील खंडणी मागण्यात आली होती. तसेच अवादा कंपनीच्या वरिष्ठांचे नंबर्स वाल्मिक कराडने घेतले होते."

फोटो स्रोत, Facebook/Walmik Karad
29 नोव्हेंबरला आलेला फोन हा त्याच धमक्यांच्या साखळीतील होता.
पण त्या दिवशी एक वेगळी घटना घडली. 29 नोव्हेंबरला दुपारी 1.00 वाजता सुदर्शन घुले मस्साजोग प्रकल्पावर आला आणि त्याने 'काम बंद करा, नाही तर हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील,' अशी धमकी दिली होती.
सुनिल शिंदेंनी आपल्या जबाबात म्हटले की, "त्याच दिवशी सुदर्शन घुलेने मला हे देखील सांगितले की, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा, तुमच्या एक एक मिनिटाची रिपोर्टिंग वाल्मिक अण्णांकडे जाते. त्यांनी जे सांगितले आहे ती डिमांड पूर्ण करा, नाहीतर काम करू दिले जाणार नाही. कुणाचाही विरोध संपादन करा, पण वाल्मिक अण्णांचा विरोध घेऊ नका."
"तुम्ही अण्णांच्या डिमांड पूर्ण केल्यानंतर तिथे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. तुम्हाला इथे 100 जण सांभाळण्यापेक्षा तिथे एकाच जागेवर सेटलमेंट राहू द्या. त्यानंतर तुम्हाला कुठेच काही करायची गरज पडणार आहे," असे सुदर्शनने म्हटल्याची नोंद चार्जशीटमध्ये आहे.
या धमक्यांनंतर सुनिल शिंदे हे घाबरले. त्यांनी वेळोवेळी पोलीस आणि वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. लेखी तक्रारी दिल्या. फोनवर येणाऱ्या धमक्यानंतर आता आरोपी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडायच्या धमक्या देऊ लागले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
6 डिसेंबर 2024 - स्थळ - अवादा प्रकल्प कार्यालय मस्साजोग
अवादा कंपनीच्या गेटवर चार पाच जण काळ्या स्कॉर्पिओतून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या अमरदीप सोनवणेंना मारहाण केली आणि काठी गेटवर आपटत गेट उघडण्यास भाग पाडले. त्याच ठिकाणी अमरदीप यांच्यासोबत अशोक सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे होते.
अमरदीप यांना आल्या आल्या सुदर्शन घुलेनी, 'सरक रे' असे म्हटले होते.
त्यादिवशी काय घडले हे अशोक सोनवणेंनी त्यांच्या दिलेल्या जबाबातून समजून घेऊ.
सोनवणे जबाबात सांगतात, "त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मी सुदर्शन घुले आहे. मी वाल्मिक अण्णांचा माणूस आहे. माझी वाट अडवायची तुमची लायकी आहे"संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. " loading="lazy" width="800" height="450" style="aspect-ratio:800 / 450" class="bbc-139onq"/>
एक लोखंडी रॉड आणि एक बांबूची काठी ही हत्यारे पोलिसांना सापडली. आणखी एक हत्यार वापरण्यात आले होते ते पोलिसांना तपासात सापडले. ते म्हणजे पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप.
या पाईपने सरपंचांना इतकी मारहाण करण्यात आली होती की या पाईपचे एकूण 15 तुकडे झाले आणि ते शेतात विखरले गेले होते.
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. 15 व्हीडिओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे.
या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली.

संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम अहवालात (पीएम रिपोर्ट) त्यांना झालेल्या मारहाणीचे तपशील आहेत. रक्ताचे ओघळ डोक्यावरुन वाहत पायापर्यंत येऊन वाळून गेल्याचे एकेठिकाणी सांगितले आहे. चेहऱ्यापासून ते पायापर्यंत सर्व ठिकाणी त्यांना बोथट हत्यारांनी वारंवार मारण्यात आले होते.
देशमुख यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ही धोकादायक नव्हती, परंतु जर खूप ताकदीने वापर केला, तर ती हत्यारे धोकादायक ठरू शकतात असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकळल्याच्या खुणा आहेत. पाठीवर तर एकही जागा शिल्लक नाहीये जिथे रक्त साकाळले नाही. संपूर्ण पाठीवर रक्त साकळले आहे अशी नोंद पीएम रिपोर्टमध्ये आहे.
या रिपोर्टमध्ये एकूण 56 नोंदी आहेत. एकाच प्रकारची जखम असेल, तर त्या जखमेची नोंद एकच अशा या 56 नोंदी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नेमके किती वार झाले किंवा त्यांना किती ठोसे लगवण्यात आले याची गिनती या ठिकाणी नाहीये.
9 डिसेंबर - वेळ संध्याकाळी 7 च्या सुमारास, दैठणा शिवार, ता. केज
दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहापर्यंत देशमुख यांना मारहाण झाल्याचे चार्जशीटमधून समजते. त्यांचे प्राण गेल्यावर किंवा प्राण गेले आहेत असे समजून आरोपींनी त्यांना दैठणा शिवारात रस्त्याच्या कडेला टाकले.
संतोष देशमुख यांच्या शोधात पोलिसांनी पथके पाठवली होती. संतोष देशमुख जेव्हा पोलिसांना सापडले तेव्हा ते रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावर दैठणा शिवारात उताण्या अवस्थेत निपचित पडलेले होते असे म्हटले आहे.
सरपंचांचे शरीर हे थंड होते आणि थोड्या अंतरावर त्यांच्या पांढऱ्या बनियनची बाही पूर्णपणे फाटून त्याचा सपाट कपडा झाला होता.
तेथून जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा सरपंच संतोष देशमुख हे 'ब्रॉट डेड' आणले गेले, अशी नोंद आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale
या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. नंतर अटकसत्र सुरू झाले. एक-एक करुन सात आरोपींना या प्रकरणात अटक झाली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
या प्रकरणात तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)