'आम्हाला कामातून वेळ मिळत नाही, मग खलिस्तानवर कधी बोलणार"'आम्हाला कामातून वेळ मिळत नाही, मग खलिस्तानवर कधी बोलणार?' canada sikh कॅनडामध्ये काम करणारा शीख माणूस" loading="eager" width="1955" height="1099" style="aspect-ratio:1955 / 1099" class="bbc-139onq"/>
फोटो स्रोत, Getty Images
- Author, खुशाल लाली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, ब्रॅम्पटन
"आम्हाला आमच्या कामांच्या शिफ्टमधूनच वेळ मिळत नाही, खलिस्तानवर कधी चर्चा करणार? माझीच नाही, तर माझ्या ओळखीच्या सर्वांचीच स्थिती औताला बांधलेल्या बैलासारखी आहे."
हे शब्द आहेत ब्रॅम्पटनच्या 30 वर्षीय टॅक्सी चालक गुरजीत सिंह याचे. तो मागील 4 वर्षांपासून येथे राहतो आहे.
भारत आणि कॅनडामधील राजकीय वादानंतर कॅनडातील खलिस्तानी आंदोलनाची भारतात बरीच चर्चा आहे.
या खलिस्तानी आंदोलनाचं वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ब्रॅम्पटनमधील काही लोकांशी चर्चा केली. गुरजीत सिंह यापैकीच एक आहे.
कॅनडातील कथित खलिस्तान समर्थक आंदोलनातील लोकांविषयी बोलताना गुरजीत सिंह म्हणाला, ''आम्ही ज्या समाजात राहतो त्याला येथे 'विकेंड सोसायटी' म्हणतात. आमचा जन्मदिन आणि भोग कार्यक्रमाचं आयोजनही आठवड्यातील सुट्टीच्या दिवशीच होतं."
कॅनडाचा खलिस्तानी रंग
मागील वर्षी मे महिन्यात फुटिरतावादी शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येमागे भारतीय एजंट असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारत आणि कॅनडातील संबंध कमालीचे बिघडले आहेत.
हे प्रकरण इतकं ताणलं गेलं की, दोन्ही देशांनी एकमेकांच्या दुतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितलं.
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला. यावेळी मी कॅनडातील ओंटारियो भागातील अनेक लोकांशी चर्चा केली. मात्र त्यातील बहुतांश लोकांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
मी ज्या लोकांशी चर्चा केली त्यातील एकही व्यक्ती नियमितपणे खलिस्तानी कार्यकर्ता म्हणून कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणारा नव्हता. असं असलं तरी हे सर्व गुरुद्वारामध्ये जाऊन कीर्तन व इतर कार्यक्रमात सहभागी व्हायचे. तसेच तेथे होणाऱ्या फुटिरतावादी नेत्यांची भाषणं ऐकतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कॅनडातील खलिस्तानी आंदोलनाचं जसं चित्र उभं केलं जातं, तसं वास्तवात मला काहीही दिसलं नाही.
गुरुद्वारांच्या बाहेर खलिस्तानचे झेंडे, लंगर हॉलमध्ये 1980 च्या दशकात पंजाबमध्ये झालेल्या सशस्त्र आंदोलनातील कट्टरतावादी नेत्यांचे फोटो याशिवाय दुसरं काहीही पाहायला मिळालं नाही.
असे फोटो आणि घोषवाक्ये मी पंजाबमध्येही सर्रास पाहिले आणि ऐकले आहेत.
कॅनडाच्या गुरुद्वारांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 1984 च्या शिख दंगलीतील आरोपींना शिक्षा न होणं, जून 1984 मधील अकाल तख्त साहिबवर भारतीय सैन्याने केलेली कारवाई आणि 2-3 दशकांपासून तुरुंगात असलेल्या शीख कैद्यांच्या सुटकेच्या मुद्द्यावर जोरदारपणे बोललं जातं.
गुरुद्वारातील कीर्तन, सत्संग आणि इतर कार्यक्रमांमध्येही या मुद्द्यांचा प्रभाव दिसतो.
खालिस्तान समर्थक नेते आक्रमकपणे यावर बोलताना आणि घोषणा देताना दिसतात. मात्र, याला सामान्य लोकांकडून तेवढाच पाठिंबा मिळतो, जेवढा पंजाबमध्ये मिळतो.
कॅनडात ज्याप्रमाणे खलिस्तानी आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसत नाही, तसाच कुणी विरोधही करताना दिसत नाही.


खलिस्तान समर्थक लोकच गुरुद्वारांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनात असतात आणि हेच लोक राजकीय सभा आणि इतर गोष्टींमध्येही सहभागी असतात. त्यामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
भारतात खलिस्तानवादी 'सिख फॉर जस्टिस' संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करत बंदी घालण्यात आली आहे.
या संघटनेच्या जनमत संग्रहाच्या मुद्द्याला लोकांचा मिळणारा पाठिंबा हा प्रामुख्याने गुरुद्वारांमध्ये होणाऱ्या प्रचारामुळेच आहे.
'सिख फॉर जस्टिस'ने आणि अमेरिकेने भारतावर हस्तकांमार्फत फुटिरतावादी शिख नेता गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिक विकास यादवविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
पंजाबमधील माजी खासदार सिमरनजीत सिंह मान आणि विद्यमान खासदार अमृतपाल सिंह या दोघांचा अधिक प्रभाव दिसतो. ते दोघेही सार्वजनिकपणे खलिस्तानला पाठिंबा दाखवतात.
खलिस्तानवाद्यांशी संबंधित प्रश्न
भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झाल्यावर सर्वाधिक चर्चा कॅनडातील खलिस्तानी आंदोलन आणि खलिस्तानवादी नेते यांचीच राहिली.
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारताने कॅनडातील खलिस्तानवादी संघटनांवर भारतात हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
या घटनाक्रमानंतर खलिस्तानवादी आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. यानंतर बीबीसीने सर्वाधिक शीख लोकसंख्या असलेल्या कॅनडातील ओंटारियो भागात या आंदोलनाशी संबंधित लोक, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Getty Images
या चर्चेत भारतात सरकार आणि माध्यमांकडून कॅनडातील खलिस्तानवादी नेत्यांना जसं दाखवलं जातं त्याबाबत वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कॅनडात खलिस्तानी नेत्यांची संख्या किती मोठी आहे, त्यांचा कॅनडाच्या राजकारणावर किती आणि कसा प्रभाव पडतो, कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भारतासारख्या मोठ्या देशाशी असलेले संबंध पणाला लावावेत इतका त्यांचा प्रभाव आहे का? याबाबतही बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कॅनडातील अनिवासी भारतीय
कॅनडातील 2021 च्या जनगणनेनुसार, तेथे अनिवासी भारतीयांची लोकसंख्या जवळपास 13 लाख इतकी आहे. यात 7.71 लाख शीख लोकसंख्या आहे. ही आकडेवारी तीन वर्षांपूर्वीची आहे.
जाणकारांचं म्हणणं आहे की, मागील तीन-चार वर्षात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या रुपात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी अधिकृत आकडेवारी म्हणून आजही 2021 च्या जनगणनेलाच गृहीत धरलं जातं.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षात अनिवासी भारतीयांच्या लोकसंख्येत दोन प्रकारचे मोठे बदल झाले आहेत.
पहिला म्हणजे पंजाबमधून मोठ्या संख्येने होणारं तरुणांचं स्थलांतर आणि दुसरा म्हणजे पंजाबशिवाय गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांमधील लोकांचं कॅनडातील आगमन. या बदलाने कॅनडातील अनिवासी भारतीय समुहाला एक नवं रुप दिलं आहे.
कॅनडात खलिस्तानवादी विचार किती प्रभावी?
कॅनडातील फुटिरतावादी शीख आंदोलनाची चर्चा करायची ठरली तर त्याविषयी वेगवेगळे विचार समोर येतात.
ओंटारियो गुरुद्वारी समिती येथील 19 प्रमुख गुरुद्वारांच्या समितींची एक संयुक्त संघटना आहे.
खलिस्तानी आंदोलनाचा कॅनडातील मुख्यप्रवाही राजकारणावर किती प्रभाव आहे, असा प्रश्न आम्ही ओंटारियो गुरुद्वार समितीचे प्रवक्ते अमरजीत सिंह मान यांना विचारला.
यावर अमरजीत सिंह मान म्हणाले, ''एकीकडे भारतीय माध्यमं खलिस्तानी मूठभर (फ्रिंज इलेमेंट) आहेत असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे ट्रूडो सरकार खलिस्तानवादी मतांसाठी भारताशी वाद करत आहेत असंही म्हणत आहेत. त्यांच्या पहिल्या वाक्यावरूनच खलिस्तानचा विषय संपतो."

फोटो स्रोत, Getty Images
भारत सरकारकडून सातत्याने कॅनडा सरकारवर आरोप होत आहे की, खलिस्तानवादी मतांसाठी ट्रूडो नरेंद्र मोदी सरकारवर खलिस्तानवादी नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आणि संघटित गुन्हे केल्याचा आरोप करत आहे.
या आरोपावर अमरजीत सिंह मान यांनी दावा केला, ''जर कॅनडात मूठभर खलिस्तानवादी आहेत, तर मग ट्रूडो यांचं त्यांच्याही काय घेणंदेणं? त्यामुळे त्यासाठी ट्रूडो यांनी इतका मुद्दा लावून धरण्यासारखं काही नाही. आमची संख्या अधिक असली असती, तरच ट्रूडोंवर हे आरोप केले जाऊ शकतात."
कॅनडाच्या राजकारणावर खलिस्तानवाद्यांचा किती प्रभाव आहे, असा प्रश्न मान यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "आमचा खूप प्रभाव आहे. आमची संख्या आधीपेक्षा खूप वाढली आहे."
"असं असलं तरी आम्ही केवळ एका पक्षासोबत नाही. जगमीत सिंह यांच्या एनडीपी पक्षासोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. आम्ही पोलिवार यांच्या कॉन्जर्व्हेटिव्ह पक्षासोबतही बैठका करतो," असंही मान यांनी नमूद केलं.
खलिस्तानवादाची दुसरी बाजू
असाही आरोप केला जातो की, कॅनडातील खलिस्तानवादी इतके शक्तीशाली आहेत की, त्यांच्या मतांसाठी ट्रूडो भारतावर आरोप करत आहेत.
या आरोपावर खलिस्तानवादी आंदोलनाशी संबंधित नेते भगत सिंग ब्रार यांनी प्रतिक्रिया दिली. भगत सिंग ब्रार हे ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मारले केलेल्या जागीर सिंग यांचे नातू आहेत.
जाहीर सिंग जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे मोठे भाऊ होते. भगत सिंग ब्रार खलिस्तानवादी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते लखबीर सिंग रोडे यांचे पुत्र आहेत.
ब्रॅम्पटनमध्ये कार सर्विस कंपनी चालवणारे भगत सिंग ब्रार म्हणाले, "कॅनडामध्ये शिखांची लोकसंख्या 7.71 लाख आहे. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 2 टक्के आहे. भारताचं म्हणणं मान्य केलं, तर यापैकी 1 टक्का लोक खलिस्तानवादी असतील. एवढ्या मतांसाठी ट्रूडो जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती असलेल्या देशाशी वाद घालतील का");