पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?

भारत आणि पाकिस्तान दोन्हीं देशांशी आपलं जवळच नातं असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव पुन्हा एकदा वाढला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मीरच्या मुद्दयावरुन दोन्हीं देशांतील संबंध हजारों वर्षांपासून ताणले आहेत. काश्मिरचा प्रश्न हजारों वर्षांपासून काय कदाचित त्याहूनही जास्त काळापासून सुरू असावा", असं ट्रम्प म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, "पहलगाममध्ये झालेला हल्ला अतिशय भयावह होता. त्या सीमेवर 1500 वर्षांपासून तणाव असून हा तणाव कायम आहे. पण मला खात्री आहे की ते यातून काहीतरी मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे, पण तो नेहमीच राहिला आहे."

ब्रिटिश राजवटीपासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन झालं. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

 डोनाल्ड ट्रम्प.

फोटो स्रोत, X/ANI

दरम्यान, मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

या घटनेनंतर भारत सरकारकडून पाकिस्तानसोबतच्या सिंधू नदीवरील जल कराराला स्थगित करण्याचा तसेच अटारी-वाघा सीमा त्वरित बंद करण्यासारखे विविध निर्णय घेतले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननंही अनेक पावले उचलली आहेत.

'हल्लेखोरांना मोठी शिक्षा मिळेल'- पंतप्रधान

"ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचं नियोजन करणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, शिक्षा मिळणारच. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती कट्टरतावाद्यांचं कंबरडं मोडून काढेल", असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी प्रथमच जाहीर कार्यक्रमात आपली भूमिका व्यक्त केली. बिहारमध्ये पंचायती राज दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

ते म्हणाले, "आज मी बिहारमधून संपूर्ण जगाला सांगतो, प्रत्येक दहशतवाद्याला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शिक्षा देणारा म्हणून भारत आता ओळखला जाईल. दहशतवादाला शिक्षा मिळणारच. याप्रती सगळा देश कटिबद्ध आहे.

"मानवतेवर विश्वास ठेवणारे आमच्या बाजूने आहेत. जगातल्या विविध देशांतील लोक आणि नेते आमच्या बाजूने उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो."

140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती कट्टरतावाद्यांचं कंबरडं मोडून काढेल- नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, SCREEN GRAB/ANI

मोदी पुढे म्हणाले, "दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना ज्याप्रकारे मारलं आहे, त्यामुळे देश व्यथित आहे. सर्व पीडित कुटुंबांबरोबर सर्व देश उभा आहे. ज्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. या हल्ल्यात काही लोकांनी आपला मुलगा गमावला, काहींनी भाऊ गमावला तर कोणी आपला जोडीदार गमावला.

"त्यात कोणी बंगाली भाषिक, कोणी कन्नड, कोणी मराठी, कोणी गुजराती होतं तर कोणी बिहारी. या सर्वांच्या मृत्यूत कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांचं दुःख समान आहे. हा हल्ला फक्त निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला नसून या देशाच्या शत्रूंनी भारतीयांच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं दुःसाहस केलं आहे."

1,500 स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती

वरिष्ठ पातळीवरील पोलिसांच्या सूत्रांनी बीबीसीला माहिती दिली की, जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1,500 नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

या हल्ल्यात भारतीय आणि परदेशी नागरिकांसह चार कट्टरतावादी सहभागी असल्याचा संशय असल्याचंही सूत्रांनी बीबीसीला सांगितलं आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

पहलगामच्या हल्ल्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू नदी करार तत्काळ स्थगित केला आहे.

यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान भारताकडून उचलल्या गेलेल्या पावलांवर तात्काळ प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
फोटो कॅप्शन, मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतामध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दहशतवादाचं समर्थन कधीही केलं जाऊ शकत नाही.

सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय की, भारत दीर्घकाळापासून या करारातून बाहेर पडू इच्छित होता.

पाकिस्तान भारताच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याच्या अवस्थेत 100 टक्के आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले की, हवाई हद्द उल्लंघन केल्यानंतर काय घडू शकतं, याचं अभिनंदन यांच्या रूपात दिलेले प्रत्युत्तर भारत लक्षात ठेवेल.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या मते, "भारताच्या संरक्षणाखाली बलुचिस्तानमध्ये दहशतवाद फोफावत आहे. जाफर एक्सप्रेस घटनेत काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. भारताने फुटीरतावाद्यांना आश्रय दिला आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी उपचारांसाठी भारतात जातात. याचे बरेच पुरावे आहेत."

पुढे त्यांनी म्हटलंय की, पहलगामच्या घटनेसाठी दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी भारताने स्वत:लाच दोषी ठरवलं पाहिजे.

"पहलगाम हल्ला हा भारतानेच केलेली 'बनावट कारवाई' असण्याचीही शक्यता आहे." असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते म्हणाले की, "कुणीतरी भारताला हे विचारलं पाहिजे की जर काश्मीरमध्ये निष्पाप लोक मारले जात असतील तर तिथे अनेक दशकांपासून उपस्थित असलेले सात लाख सैनिक काय करत आहेत"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली. " loading="lazy" width="800" height="450" style="aspect-ratio:800 / 450" class="bbc-139onq"/>

फोटो स्रोत, X/Narendra Modi

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली.

4) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मदत देण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलेलं आहे. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील.

5) 1 मे 2025पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 ​​वरून 30 पर्यंत कमी केली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)