गावात एसटी यायची थांबली आणि या मुलींच्या शिक्षणात अडथळा आला
इस्लामपूर पासून अगदी 15 किलोमीटर वर हायवेच्या कडेला असणाऱ्या काळमवाडी या आपल्या गावातून कॉलेज साठी ये जा करायची तर आरतीला त्यासाठी दररोज दोन अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. याशिवाय दररोज बस साठी काही तासांची वाट पहाणे हेही नेहमीचं. याचा परिणाम म्हणून तिच्या निम्म्याहून अधिक मैत्रिणींचं शिक्षण थांबून त्यांची लग्न झाल्याचं ती सांगते. कोव्हिड नंतर गावातल्या बसेसची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतोय का? पाहा बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट
रिपोर्ट – प्राची कुलकर्णी
शूट – नितीन नगरकर
एडिट – निलेश भोसले