तुकाराम महाराजांना डॉ. आ. ह. साळुंखेंनी 'विद्रोही' का म्हटलं? पाहा सविस्तर मुलाखत
बीबीसी मराठीवरील महाराष्ट्राची गोष्ट या मुलाखतींच्या मालिकेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का? महिलांची स्थिती गेल्या अर्धशतकात किती बदलली? सर्वात पहिलं संशोधन चार्वाकावर का? तुकोबांना विद्रोही का म्हटलं? पुरोगामी चळवळीतील मतभेदांचा काय परिणाम होतोय? शत्रू-मित्र विवेक म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरं डॉ. आ. ह. साळुंखे यांनी दिली.
तसंच, सामाजिक विषयांवर व्यासंगी लेखन केलेल्या डॉ. साळुंखे यांनी या मुलाखतीत महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची वाटचाल, पुरोगामी चळवळीची दिशा याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)