राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला, 'कंपाऊंडरने ऑपरेशन केलं की असा निर्णय येतो'

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलं.
10 जानेवारीला अपात्रेबाबतचा निकाल मी जाहीर केला. तेव्हापासून सातत्याने काही पक्षाचे लोक समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या गैरसमजूतीबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे असं वाटतं, अशा शब्दांमध्ये राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
2018 ची संविधान सुधारणा ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही. त्यामुळे मी ते ग्राह्य धरू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयामागची बाजू सांगितली.
राहुल नार्वेकर म्हणाले, "निकाल दिल्यानंतर खरंतर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण तरीही याबाबत या पदाबाबत गैरसमज होऊ नये यासाठी मी बोलत आहे. त्याला पत्रकार परिषद म्हणावं , दसरा मेळाव्याचं रूप म्हणावं की गल्लीबोळातील सभा होती हे कळत नाही. संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही मग यांचा संविधानावर कसा विश्वास असेल");