'शालेय आहारात आढळला मृत साप', 100 हून अधिक मुलं पडली आजारी; नेमकं काय आहे प्रकरण?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शालेय आहारात मृत साप आढळल्यानंतर शालेय आहार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
  • Author, जॉर्ज राईट
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

शालेय आहार ही तशी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे. मात्र या योजनेसंदर्भात वेळोवेळी विविध वाददेखील निर्माण झाले आहेत.

अन्नाच्या दर्जाबद्दल आणि इतर गोष्टींबाबत अनेकदा आरोपदेखील झाले आहेत.

बिहारमधील घटनेमुळे शालेय आहार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बिहारमध्ये शालेय आहारात मृत साप आढळल्यानंतर 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याच्या वृत्ताची चौकशी भारतातील मानवाधिकार संस्था करत आहे.

जेवणात मृत साप आढळल्यानंतरदेखील स्वयंपाक्यानं जेवणातून फक्त तो साप काढून टाकला आणि ते जेवण विद्यार्थ्यांना तसंच वाढलं, असं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (एनएचआरसी) म्हटलं आहे.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले